शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मार्गशीर्षमध्ये फळांची मागणी वाढली, एपीएमसीत सफरचंदाची सर्वाधिक आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 03:09 IST

पावसाळ्यामुळे चार महिने फळ मार्केटमध्ये मंदीचे वातावरण होते. पावसाळा उघडल्यापासून फळांची मागणी वाढली असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे ग्राहकांनी फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - पावसाळ्यामुळे चार महिने फळ मार्केटमध्ये मंदीचे वातावरण होते. पावसाळा उघडल्यापासून फळांची मागणी वाढली असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे ग्राहकांनी फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. चार दिवसामध्ये मुंबई बाजार समितीमधून तब्बल ८ हजार टन फळांची विक्री झाली आहे.मुंबई, नवी मुंबई व उपनगर ही कृषी व्यापाराची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. फक्त मुंबई बाजारसमितीमध्ये प्रत्येक वर्षी दहा हजार कोटी रूपयांची उलाढाल होत असते. प्रचंड उलाढाल होत असल्यामुळे बाजारसमितीने वस्तूंची विभागणी करून त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केटची उभारणी केली आहे. कांदा, बटाटा, धान्य, भाजीपाला, मसाला व फळांसाठीही स्वतंत्र मार्केट उभारण्यात आले आहे. आंबा हंगाम सुरू झाला की फळ मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात उलाढाल होते असते.आंबा हंगाम संपला की पावसाळ्यातील चार महिने आवक कमी होत असते. ग्राहकांकडूनही मागणी कमी होत असते. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे मार्केटमधील मंदिचा कालावधीही नोव्हेंबरपर्यंत वाढला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील उपवास सुरू झाल्यामुळे हाता फळांची आवक मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे. २५ नोव्हेंबरला मार्केटमध्ये फक्त ८६० टन फळांची आवक झाली होती. २७ नोव्हेंबरला ही आवक तब्बल २२५८ वर गेली आहे. तीन दिवसामध्ये आवक तिप्पट झाली आहे. सोमवारपासून सातत्याने आवक वाढू लागली आहे. चार दिवसामध्ये जवळपास ८ हजार टन फळांची आवक होवून विक्रीही झाली आहे.बाजारसमितीमध्ये देश, विदेशातून फळांची आवक होत आहे. सद्यस्थितीमध्ये सर्वाधीक आवक सफरचंदची होत आहे. काश्मीर व हिमाचलसह विदेशातूनही सफरचंद विक्रीसाठी येत आहेत. सरासरी ८०० ते १२०० टन माल विक्रीसाठी येवू लागला आहे. कर्नाटक परिसरातून कलींगड, सांगलीमधून डाळींब, राज्यातून व कर्नाटकमधून सीताफळ विक्रीसाठी येवू लागला आहे.पुणे, सांगली व सोलापूरमधून पपई विक्रीसाठी येवू लागली आहे. किवी, सफरचंद व इतर फळांची विदेशातून आवक होवू लागली आहे. मुंबईमध्ये विदेशी फळांमध्ये किवीची मागणी वाढू लागली आहे. डेंगू, मलेरियाचा अजार झाल्यानंतर शरिरातील प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्स वाढण्यासाठी किवी व इतर तंतूमय फळे खाण्यास पसंती दिली जावू लागली आहे.मार्गशीर्षमधील उपवासामुळे केळी, सफरचंद,पेरू, बोर, चिकू या फळांना ग्राहकांकडून पसंती दिली होती. उपवासासाठी ६० ते १०० रूपयांना पाच फळे विकली जात होती. मुंबईमध्ये पुढील एक महिना फळांची मागणी वाढत राहील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळींब, कलींगड यांची मोठ्याप्रमाणात आवक सुरू आहे. राज्यासह देशाच्या विविध भागातून फळांची आवक सुरू आहे. विदेशातूनही काही फळांची आवक होत असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे दोन दिवसात आवक वाढली होती.- संजय पानसरे,व्यापारी प्रतिनिधी

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई