शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

मार्गशीर्षमध्ये फळांची मागणी वाढली, एपीएमसीत सफरचंदाची सर्वाधिक आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 03:09 IST

पावसाळ्यामुळे चार महिने फळ मार्केटमध्ये मंदीचे वातावरण होते. पावसाळा उघडल्यापासून फळांची मागणी वाढली असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे ग्राहकांनी फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - पावसाळ्यामुळे चार महिने फळ मार्केटमध्ये मंदीचे वातावरण होते. पावसाळा उघडल्यापासून फळांची मागणी वाढली असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे ग्राहकांनी फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. चार दिवसामध्ये मुंबई बाजार समितीमधून तब्बल ८ हजार टन फळांची विक्री झाली आहे.मुंबई, नवी मुंबई व उपनगर ही कृषी व्यापाराची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. फक्त मुंबई बाजारसमितीमध्ये प्रत्येक वर्षी दहा हजार कोटी रूपयांची उलाढाल होत असते. प्रचंड उलाढाल होत असल्यामुळे बाजारसमितीने वस्तूंची विभागणी करून त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केटची उभारणी केली आहे. कांदा, बटाटा, धान्य, भाजीपाला, मसाला व फळांसाठीही स्वतंत्र मार्केट उभारण्यात आले आहे. आंबा हंगाम सुरू झाला की फळ मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात उलाढाल होते असते.आंबा हंगाम संपला की पावसाळ्यातील चार महिने आवक कमी होत असते. ग्राहकांकडूनही मागणी कमी होत असते. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे मार्केटमधील मंदिचा कालावधीही नोव्हेंबरपर्यंत वाढला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील उपवास सुरू झाल्यामुळे हाता फळांची आवक मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे. २५ नोव्हेंबरला मार्केटमध्ये फक्त ८६० टन फळांची आवक झाली होती. २७ नोव्हेंबरला ही आवक तब्बल २२५८ वर गेली आहे. तीन दिवसामध्ये आवक तिप्पट झाली आहे. सोमवारपासून सातत्याने आवक वाढू लागली आहे. चार दिवसामध्ये जवळपास ८ हजार टन फळांची आवक होवून विक्रीही झाली आहे.बाजारसमितीमध्ये देश, विदेशातून फळांची आवक होत आहे. सद्यस्थितीमध्ये सर्वाधीक आवक सफरचंदची होत आहे. काश्मीर व हिमाचलसह विदेशातूनही सफरचंद विक्रीसाठी येत आहेत. सरासरी ८०० ते १२०० टन माल विक्रीसाठी येवू लागला आहे. कर्नाटक परिसरातून कलींगड, सांगलीमधून डाळींब, राज्यातून व कर्नाटकमधून सीताफळ विक्रीसाठी येवू लागला आहे.पुणे, सांगली व सोलापूरमधून पपई विक्रीसाठी येवू लागली आहे. किवी, सफरचंद व इतर फळांची विदेशातून आवक होवू लागली आहे. मुंबईमध्ये विदेशी फळांमध्ये किवीची मागणी वाढू लागली आहे. डेंगू, मलेरियाचा अजार झाल्यानंतर शरिरातील प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्स वाढण्यासाठी किवी व इतर तंतूमय फळे खाण्यास पसंती दिली जावू लागली आहे.मार्गशीर्षमधील उपवासामुळे केळी, सफरचंद,पेरू, बोर, चिकू या फळांना ग्राहकांकडून पसंती दिली होती. उपवासासाठी ६० ते १०० रूपयांना पाच फळे विकली जात होती. मुंबईमध्ये पुढील एक महिना फळांची मागणी वाढत राहील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळींब, कलींगड यांची मोठ्याप्रमाणात आवक सुरू आहे. राज्यासह देशाच्या विविध भागातून फळांची आवक सुरू आहे. विदेशातूनही काही फळांची आवक होत असून मार्गशीर्षमधील पहिल्या गुरूवारमुळे दोन दिवसात आवक वाढली होती.- संजय पानसरे,व्यापारी प्रतिनिधी

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई