शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले; भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 17:01 IST

मुसळधार पावसामुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधारपावसामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची गैरसोय झाली. रस्त्यावर अनेक ठिकाणी एक फुट पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली असून ग्राहकांनी पाठ फिरविल्याने २५ टक्के मालाची विक्रीच झाली नाही. विक्री न झालेल्या पालेभाज्या फेकून द्याव्या लागल्या.

नवी मुंबईमध्ये गुरूवारी २४ तासामध्ये ५७ मीमी पावसाची नोंद झाली. एक ठिकाणी वृक्ष कोसळल्याची घटना घडली होती. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५५.५० मीमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. दिघा मध्ये ७४ व कोपरखैरणेमध्ये ७० मीमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. तुर्भे, मॅफ्को मार्केट परिसरात रोडवर पाणी साचले होते. सानपाडा, कोपरखैरणे, करावे भुयारी मार्गामध्ये पाणी साचले आहे. रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत होती. खड्यांमुळे मोटारसायकल घसरून किरकोळ अपघात होण्याच्या घटनाही होत होत्या.

मुसळधार पावसामुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नये. धोकादायक वृक्षांच्या खालून चालू नये व वाहनेही उभी करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.एपीएमसीमध्ये २७५६ टन भाजीपाल्याची आवक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे आवक कमी झाली आहे. प्रतिदिन सरासरी ६०० ते ६५० वाहनांची आवक होते. शुक्रवारी ५४५ वाहनांची आवक झाली आहे. २७५६ टन भाजीपाला विक्रीसाठी आला असून त्यामध्ये ४ लाख ४५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे २५ टक्के मालाची विक्रीच झाली नाही. खराब झालेल्या पालेभाज्या फेकून द्याव्या लागल्या. मार्केटमध्ये खराब भाजीपाल्याचे ढीग पहावयास मिळत होते.

मोरबे धरण ९८ टक्के भरले

नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. धरण परिसरातही पाऊस वाढला आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून या परिसरात ३०८८ मीमी एवढा पाऊस पडला आहे. धरणातील पाणी पातळी ८६.२८ मीटर पर्यंत वाढली आहे. अजून पावणेदोन मीटरपर्यंत पाणी साठा वाढला की धरण ओव्हरफ्लो होणार आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील दोन दिवसात धरण भरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस