शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने नवी मुंबईला झोडपले; भाजीपाला खरेदीकडे ग्राहकांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 17:01 IST

मुसळधार पावसामुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधारपावसामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची गैरसोय झाली. रस्त्यावर अनेक ठिकाणी एक फुट पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली असून ग्राहकांनी पाठ फिरविल्याने २५ टक्के मालाची विक्रीच झाली नाही. विक्री न झालेल्या पालेभाज्या फेकून द्याव्या लागल्या.

नवी मुंबईमध्ये गुरूवारी २४ तासामध्ये ५७ मीमी पावसाची नोंद झाली. एक ठिकाणी वृक्ष कोसळल्याची घटना घडली होती. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५५.५० मीमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. दिघा मध्ये ७४ व कोपरखैरणेमध्ये ७० मीमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. तुर्भे, मॅफ्को मार्केट परिसरात रोडवर पाणी साचले होते. सानपाडा, कोपरखैरणे, करावे भुयारी मार्गामध्ये पाणी साचले आहे. रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत होती. खड्यांमुळे मोटारसायकल घसरून किरकोळ अपघात होण्याच्या घटनाही होत होत्या.

मुसळधार पावसामुळे अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनाकारण घराबाहेर पडू नये. धोकादायक वृक्षांच्या खालून चालू नये व वाहनेही उभी करू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.एपीएमसीमध्ये २७५६ टन भाजीपाल्याची आवक

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे आवक कमी झाली आहे. प्रतिदिन सरासरी ६०० ते ६५० वाहनांची आवक होते. शुक्रवारी ५४५ वाहनांची आवक झाली आहे. २७५६ टन भाजीपाला विक्रीसाठी आला असून त्यामध्ये ४ लाख ४५ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे २५ टक्के मालाची विक्रीच झाली नाही. खराब झालेल्या पालेभाज्या फेकून द्याव्या लागल्या. मार्केटमध्ये खराब भाजीपाल्याचे ढीग पहावयास मिळत होते.

मोरबे धरण ९८ टक्के भरले

नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. धरण परिसरातही पाऊस वाढला आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून या परिसरात ३०८८ मीमी एवढा पाऊस पडला आहे. धरणातील पाणी पातळी ८६.२८ मीटर पर्यंत वाढली आहे. अजून पावणेदोन मीटरपर्यंत पाणी साठा वाढला की धरण ओव्हरफ्लो होणार आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पुढील दोन दिवसात धरण भरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस