शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुसळधार पावसाने नवी मुंबईमध्ये भूस्खलन, संरक्षण भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:28 IST

मुसळधार पावसाने सोमवारी रात्री सीबीडी सेक्टर-५मध्ये भूस्खलन झाले. डोंगर उतारावरील जमीन जवळपास ५० फूट खचल्याने कल्पतरू इमारतीची संरक्षण भिंत तुटून मातीचा भराव इमारतीच्या आवारात पसरला.

नवी मुंबई : मुसळधार पावसाने सोमवारी रात्री सीबीडी सेक्टर-५मध्ये भूस्खलन झाले. डोंगर उतारावरील जमीन जवळपास ५० फूट खचल्याने कल्पतरू इमारतीची संरक्षण भिंत तुटून मातीचा भराव इमारतीच्या आवारात पसरला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबई व नवी मुंबईकरांना २६ जुलै २००५च्या महाप्रलयाची आठवण करून दिली. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सेक्टर ५मधील कल्पतरू सोसायटीच्या वरील बाजूला भूस्खलन झाले. जवळपास ५० फूट परिसरातील जमिनीचा भाग खचला. यामुळे सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. अचानक झालेल्या आवाजामुळे सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी तत्काळ महापालिकेच्या अधिकाºयांना माहिती देऊन मदत उपलब्ध करून दिली. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महापौर सुधाकर सोनावणे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन मातीचे ढिगारे तत्काळ बाजूला करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. शहरात दिवसभर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईमध्ये नोकरीनिमित्त निघालेले चाकरमानी दिवसभर ट्रेन व रोडमध्येच अडकून राहिले होते. हार्बर रेल्वे धिम्या गतीने सुरू होती. सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूकही संथ गतीने सुरू होती. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या.मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी सायंकाळपर्यंत कुठेही जीवितहानी झाली नव्हती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी, फळ व मसाला मार्केटमध्ये पाणी साचले होते. सानपाडा सेक्टर-२मध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले होते. बोनसरी व इतर अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यातील पाणी वसाहतीमध्ये शिरले होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला होता.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार