शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
3
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
4
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
5
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
6
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
7
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
8
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
9
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
10
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
11
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
12
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
13
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
14
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
15
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
16
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
17
Shefali Jariwala: "सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
18
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
19
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
20
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...

पाणीबाणी! दोन गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:33 IST

सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले. गाढीसह सर्व नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे टेकडीवरील घर कोसळले.

नवी मुंबई, पनवेल -  सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले. गाढीसह सर्व नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे टेकडीवरील घर कोसळले. कोपरखैरणेमध्येही घरातील स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडली असून महामार्गावरील चक्काजामची स्थिती कायम आहे.पावसाचा जोर कायम असल्याने पनवेल तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. तालुक्यातील गाढी, कासाडी या नद्या दुथडी वाहत होत्या. शहरात सखल भागात पाणी साचल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. तसेच तालुक्यातील सिद्धी करवले व तळोजा या गावांना जोडणारा डांबरी रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याची घटना देखील आज घडली. खारघरमधील पांडवकडा तसेच तालुक्यातील इतर धबधबे यावेळी ओसंडून वाहत होते. पावसाचा सर्वात जास्त फटका मुंबई-गोवा व सायन-पनवेल या महामार्गांना बसला आहे. या मार्गावर हजारो खड्डे पडले असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सायन-पनवेल महामार्गाची मोठी दुर्दशा होऊन देखील प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना राबविल्या जात नाहीत. विशेष म्हणजे खारघरपासून कळंबोलीपर्यंत वाहनांच्या सुमारे तीन ते चार किमी रांगा लागून देखील खारघर टोल नाक्यावर सर्रास टोल वसुली सुरू आहे. कळंबोली, खारघर, उरण फाटा या ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. मात्र सतत तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तहसील कार्यालय, महानगर पालिका प्रशासन व सिडकोच्या अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडालेली यावेळी पाहावयास मिळाली. कळंबोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कळंबोली शहर हे सखल भागात वसले असल्याने दरवर्षी अतिवृष्टीमुळे कळंबोली शहरात ठिकठिकाणी पाणी साचत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे.वाहतूककोंडीकधी सुटणार?सायन- पनवेलसह मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. एक आठवड्यापासून सातत्याने रोज वाहतूककोंडी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून नागरिकांमधील असंतोष दिवसेंदवस वाढत चालला आहे.गणपतीपाडामध्ये भीतीचे वातावरणएमआयडीसीमधील गणपतीपाडा परिसरात जय कुमार यांचे घर दुपारी ३ वाजता पावसामुळे कोसळले. घरात सात सदस्य असून सगळे कामासाठी एपीएमसीमध्ये गेले असल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. शिवसेना शाखा प्रमुख महेश कोठीवाले, सिद्धराम शिलवंत व इतर कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून मदतकार्य सुरू केले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी व विभाग कार्यालयातील कर्मचाºयांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली. याठिकाणी जवळपास १५ घरांना धोका असून पाऊस असाच सुरू राहिला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सायन-पनवेल महामार्गावर तात्पुरती मलमपट्टीसायन-पनवेल महामार्गावर अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत. खारघर टोल नाक्यावर खोदकाम करून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले आहे. याठिकाणी मोठ्या अपघाताचा धोका असल्याचे नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात कळविले आहे. मात्र तात्पुरती मलमपट्टी लावून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे होत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीरतीन दिवस सतत कोसळणाºया पावसामुळे धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी कोपरखैरणेमधील चंद्रलोक गृहनिर्माण सोसायटीमधील योगेश पाटील यांच्या घरातील स्लॅबचा काही भाग कोसळला. नगरसेवक रामदास पवळे यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.पनवेलमधील पुलाला गळतीपनवेल शहरातून जाणाºयाडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उन्नत पुलाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी जोडलेले पाइप यांची व्यवस्थित जोडणी नसल्याने जवळजवळ ५0 ठिकाणी गळती लागली आहे. विशेष म्हणजे या गळतीमुळे तयार झालेले पाण्याचे फवारे या मार्गावरून जाणाºया वाहन चालकांच्या अंगावर पडत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या गळतीला लहान धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई