शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

पाणीबाणी! दोन गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:33 IST

सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले. गाढीसह सर्व नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे टेकडीवरील घर कोसळले.

नवी मुंबई, पनवेल -  सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले. गाढीसह सर्व नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे टेकडीवरील घर कोसळले. कोपरखैरणेमध्येही घरातील स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडली असून महामार्गावरील चक्काजामची स्थिती कायम आहे.पावसाचा जोर कायम असल्याने पनवेल तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. तालुक्यातील गाढी, कासाडी या नद्या दुथडी वाहत होत्या. शहरात सखल भागात पाणी साचल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. तसेच तालुक्यातील सिद्धी करवले व तळोजा या गावांना जोडणारा डांबरी रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याची घटना देखील आज घडली. खारघरमधील पांडवकडा तसेच तालुक्यातील इतर धबधबे यावेळी ओसंडून वाहत होते. पावसाचा सर्वात जास्त फटका मुंबई-गोवा व सायन-पनवेल या महामार्गांना बसला आहे. या मार्गावर हजारो खड्डे पडले असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सायन-पनवेल महामार्गाची मोठी दुर्दशा होऊन देखील प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना राबविल्या जात नाहीत. विशेष म्हणजे खारघरपासून कळंबोलीपर्यंत वाहनांच्या सुमारे तीन ते चार किमी रांगा लागून देखील खारघर टोल नाक्यावर सर्रास टोल वसुली सुरू आहे. कळंबोली, खारघर, उरण फाटा या ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. मात्र सतत तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तहसील कार्यालय, महानगर पालिका प्रशासन व सिडकोच्या अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडालेली यावेळी पाहावयास मिळाली. कळंबोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कळंबोली शहर हे सखल भागात वसले असल्याने दरवर्षी अतिवृष्टीमुळे कळंबोली शहरात ठिकठिकाणी पाणी साचत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे.वाहतूककोंडीकधी सुटणार?सायन- पनवेलसह मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. एक आठवड्यापासून सातत्याने रोज वाहतूककोंडी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून नागरिकांमधील असंतोष दिवसेंदवस वाढत चालला आहे.गणपतीपाडामध्ये भीतीचे वातावरणएमआयडीसीमधील गणपतीपाडा परिसरात जय कुमार यांचे घर दुपारी ३ वाजता पावसामुळे कोसळले. घरात सात सदस्य असून सगळे कामासाठी एपीएमसीमध्ये गेले असल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. शिवसेना शाखा प्रमुख महेश कोठीवाले, सिद्धराम शिलवंत व इतर कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून मदतकार्य सुरू केले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी व विभाग कार्यालयातील कर्मचाºयांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली. याठिकाणी जवळपास १५ घरांना धोका असून पाऊस असाच सुरू राहिला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सायन-पनवेल महामार्गावर तात्पुरती मलमपट्टीसायन-पनवेल महामार्गावर अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत. खारघर टोल नाक्यावर खोदकाम करून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले आहे. याठिकाणी मोठ्या अपघाताचा धोका असल्याचे नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात कळविले आहे. मात्र तात्पुरती मलमपट्टी लावून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे होत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीरतीन दिवस सतत कोसळणाºया पावसामुळे धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी कोपरखैरणेमधील चंद्रलोक गृहनिर्माण सोसायटीमधील योगेश पाटील यांच्या घरातील स्लॅबचा काही भाग कोसळला. नगरसेवक रामदास पवळे यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.पनवेलमधील पुलाला गळतीपनवेल शहरातून जाणाºयाडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उन्नत पुलाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी जोडलेले पाइप यांची व्यवस्थित जोडणी नसल्याने जवळजवळ ५0 ठिकाणी गळती लागली आहे. विशेष म्हणजे या गळतीमुळे तयार झालेले पाण्याचे फवारे या मार्गावरून जाणाºया वाहन चालकांच्या अंगावर पडत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या गळतीला लहान धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई