शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबाणी! दोन गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:33 IST

सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले. गाढीसह सर्व नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे टेकडीवरील घर कोसळले.

नवी मुंबई, पनवेल -  सलग तिसऱ्या दिवशी नवी मुंबईसह पनवेलला पावसाने झोडपले. गाढीसह सर्व नद्यांनी रौद्र रूप धारण केले असून काठावरील गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमधील गणपतीपाडा येथे टेकडीवरील घर कोसळले. कोपरखैरणेमध्येही घरातील स्लॅबचा भाग कोसळल्याची घटना घडली असून महामार्गावरील चक्काजामची स्थिती कायम आहे.पावसाचा जोर कायम असल्याने पनवेल तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. तालुक्यातील गाढी, कासाडी या नद्या दुथडी वाहत होत्या. शहरात सखल भागात पाणी साचल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. तसेच तालुक्यातील सिद्धी करवले व तळोजा या गावांना जोडणारा डांबरी रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याची घटना देखील आज घडली. खारघरमधील पांडवकडा तसेच तालुक्यातील इतर धबधबे यावेळी ओसंडून वाहत होते. पावसाचा सर्वात जास्त फटका मुंबई-गोवा व सायन-पनवेल या महामार्गांना बसला आहे. या मार्गावर हजारो खड्डे पडले असून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सायन-पनवेल महामार्गाची मोठी दुर्दशा होऊन देखील प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना राबविल्या जात नाहीत. विशेष म्हणजे खारघरपासून कळंबोलीपर्यंत वाहनांच्या सुमारे तीन ते चार किमी रांगा लागून देखील खारघर टोल नाक्यावर सर्रास टोल वसुली सुरू आहे. कळंबोली, खारघर, उरण फाटा या ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याचे यावेळी पाहावयास मिळाले.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. मात्र सतत तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे तहसील कार्यालय, महानगर पालिका प्रशासन व सिडकोच्या अधिकाºयांची चांगलीच तारांबळ उडालेली यावेळी पाहावयास मिळाली. कळंबोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कळंबोली शहर हे सखल भागात वसले असल्याने दरवर्षी अतिवृष्टीमुळे कळंबोली शहरात ठिकठिकाणी पाणी साचत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात देखील या पावसाचा मोठा फटका बसला आहे.वाहतूककोंडीकधी सुटणार?सायन- पनवेलसह मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. एक आठवड्यापासून सातत्याने रोज वाहतूककोंडी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून नागरिकांमधील असंतोष दिवसेंदवस वाढत चालला आहे.गणपतीपाडामध्ये भीतीचे वातावरणएमआयडीसीमधील गणपतीपाडा परिसरात जय कुमार यांचे घर दुपारी ३ वाजता पावसामुळे कोसळले. घरात सात सदस्य असून सगळे कामासाठी एपीएमसीमध्ये गेले असल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. शिवसेना शाखा प्रमुख महेश कोठीवाले, सिद्धराम शिलवंत व इतर कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी जावून मदतकार्य सुरू केले. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी व विभाग कार्यालयातील कर्मचाºयांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली. याठिकाणी जवळपास १५ घरांना धोका असून पाऊस असाच सुरू राहिला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सायन-पनवेल महामार्गावर तात्पुरती मलमपट्टीसायन-पनवेल महामार्गावर अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत. खारघर टोल नाक्यावर खोदकाम करून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे झाले आहे. याठिकाणी मोठ्या अपघाताचा धोका असल्याचे नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात कळविले आहे. मात्र तात्पुरती मलमपट्टी लावून सार्वजनिक बांधकाम विभाग मोकळे होत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीरतीन दिवस सतत कोसळणाºया पावसामुळे धोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी कोपरखैरणेमधील चंद्रलोक गृहनिर्माण सोसायटीमधील योगेश पाटील यांच्या घरातील स्लॅबचा काही भाग कोसळला. नगरसेवक रामदास पवळे यांनी तत्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.पनवेलमधील पुलाला गळतीपनवेल शहरातून जाणाºयाडॉ. नानासाहेब धर्माधिकारी उन्नत पुलाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी जोडलेले पाइप यांची व्यवस्थित जोडणी नसल्याने जवळजवळ ५0 ठिकाणी गळती लागली आहे. विशेष म्हणजे या गळतीमुळे तयार झालेले पाण्याचे फवारे या मार्गावरून जाणाºया वाहन चालकांच्या अंगावर पडत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या गळतीला लहान धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई