शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

प्रदूषणकारी कंपन्यांमुळे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 23:43 IST

तळोजासह ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : तळोजासह ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांकडून रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडले जात आहे. यामुळे कासाडी नदीसह खाडीतील प्रदूषणामध्ये वाढ होऊन तेथील जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई होत नसल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईसह पनवेलमधील प्रदूषणाचा विषय गंभीर झाला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये ठाणे बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणावर स्थानिक आमदारांनी लक्षवेधी मांडली. शासनानेही कारखान्यांकडून प्रदूषण होत असल्याचे मान्य केले आहे. सर्वात गंभीर स्थिती तळोजामधील आहे. २०१७ च्या तपशीलाप्रमाणे ३६५ कारखान्यांची सीईटीपीला जोडणीच झाली नसल्याने तेथील प्रदूषित पाणी नाल्यांमध्ये सोडले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने १५७ कारखाने प्रदूषित असल्याने सांगून ९३ कारखान्यांना नोटीस देण्यात आली असून ४ कारखाने बंद करण्याच्या नोटीस दिल्या होत्या.नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही तळोजामध्ये प्रदूषण होत असल्याचे मान्य केले आहे. प्रदूषणामुळे ७२ कंपन्या बंद, ६३ कारखान्यांना नोटीस देण्यात आली असून १०० कंपन्यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनीही आॅक्टोबर २०१७ मध्ये हरित लवादाकडे तक्रार केली आहे. लवादानेही प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. याविषयी पुढील सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयातही याविषयी याचिका दाखल करण्यात आली आहे. दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप अनेक कारखान्यातील पाणी कासाडी नदीमध्ये सोडले जात आहे.ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधील पाणीही अनेक वेळा नाल्यामध्ये सोडले जात आहे. कोपरखैरणे, कोपरी व जुईनगर नाल्यामध्ये दूषित पाणी सोडले जाते. पाऊस जास्त झाला की कारखान्यातील दूषित पाणीही नाल्यात सोडले जाते. एमआयडीसीने पावणे येथे एचटीपी केंद्र उभारले आहे. परंतु येथील यंत्रणा जुनी झाली असल्यामुळे योग्यपद्धतीने पाण्यावर प्रक्रिया होत नाही. प्रक्रिया केलेले पाणी पाइपद्वारे खाडीमध्ये सोडले जात आहे. परंतु पाइप जुनी झाली असल्यामुळे अनेक ठिकाणी गळती सुरू आहे. अधिवेशनामध्ये या विषयावर आवाज उठविल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योजकांची बैठक घेऊन पाइपची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एमआयडीसीमधील हवा प्रदूषण कमी झाले असले तरी जलप्रदूषण काही प्रमाणात सुरू असल्याची माहितीही अधिकाºयांनी दिली. नगरसेविका दिव्या गायकवाड २०१७ पासून प्रदूषण करणाºया कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी करत असून प्रशासन योग्यपद्धतीने प्रतिसाद देत नसल्यामुळे हरित लवादाकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.>हरित लवादाचा आदेशदेशभरातील प्रदूषणकारी उद्योग येत्या तीन महिन्यांत बंद करा, असा आदेश केंद्रीय हरित लवादाने १६ जुलैला दिला आहे. विकासाच्या नावाखाली आम्ही उद्योगांना नागरिकांच्या जीवाशी खेळू देणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे. नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये जे कारखानदार सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत, ज्यांना बंदीचे आदेश हरित लवादाने दिले आहेत, ते आता बंद करणार का? याविषयी उत्सुकता आहे.>कासाडीला नाल्याचे स्वरूपतळोजातील कारखान्यांच्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका कासाडी नदीला बसला आहे. नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. रसायनमिश्रीत पाणी सोडल्यामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते योगेश पगडे व इतरांनी नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी चळवळ उभी केली आहे. दूषित पाणी सोडणे थांबविले नाही तर कासाडीमधील जैवविविधतेचे अस्तित्व संपण्याची शक्यता आहे.>तळोजातील कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. २०१७ मध्ये हरित लवादाकडे तक्रार केली. लवादानेही नोटीस व सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाºया कारखान्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.- अरविंद म्हात्रे, नगरसेवक, पनवेल>नवी मुंबईमधील प्रदूषणाविषयी २०१७ पासून पाठपुरावा करत आहोत. प्रशासन कडक कारवाई करत नाही. यामुळे आम्ही लवकरच हरित लवादाकडे दाद मागणार आहोत.- वैभव गायकवाड,माजी नगरसेवक