शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
4
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
5
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
6
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
7
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
8
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
9
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
10
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
11
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
12
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
13
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
14
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
16
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
17
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
18
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
19
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
20
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!

जेएनपीए, जिल्हा प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 21:17 IST

४ फेब्रुवारी रोजी पुनर्वसनासाठी मंजूर केलेल्या जागेचा २५६ कुटुंब घेणार ताबा : बैठकीत निर्णय

मधुकर ठाकूर/उरण : रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २६ जानेवारी २०२४ पर्यंत जेएनपीएकडून देण्यात आलेल्या १०.०८ हेक्टर जागेचे सातबारा उतारे वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या नावे करून देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध करुन सातबारा नावे करो अथवा न करो ४ फेब्रुवारीपासून जागेचा ताबा घेऊन २५६ कुटुंबांनी नवीन जागेत राहायला जाण्याचा निर्णय ग्रामस्थांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे.ग्रामस्थांच्या निर्णयामुळे मात्र प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

मागील ३८ वर्षांपासून जेएनपीए बंदरामुळे विस्थापित झालेल्या हनुमान कोळीवाडा गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही.याविरोधात ग्रामस्थांचा केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार संघर्ष सुरू आहे. मागील ३८ वर्षात ५२५ पेक्षा अधिक बैठका झाल्या आहेत.शेकडो वेळा चर्चाही घडल्या आहेत. मात्र त्यानंतरही हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी तीन वेळा जेएनपीए समुद्र चॅनल रोखुन बंदरातील कंटेनर मालाची वाहतूकच रोखुन आपली नाराजी व्यक्त केली होती.

मध्यंतरीच्या काळात जेएनपीए व जिल्हा प्रशासनाने वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी जसखार व फुंण्डे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सुमारे १०.०८ हेक्टर क्षेत्रावर पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते.जागा विकसित करुन देण्यासाठी जेएनपीएने ६४ कोटींचा निधीही जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला आहे.मात्र मागील तीन वर्षांपासून पुनर्वसनाच्या जागेचे घोंगडे भिजत पडले आहे.

त्यानंतर ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर पुनर्वसनाचे काम त्वरित करण्यासाठी जेएनपीएने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी जेएनपीएने मंजूर केलेल्या जागेचे सातबारा उतारे २६ जानेवारी २०२४ पुर्वी त्यांच्या नावाने करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र जिल्हा प्रशासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे कोणत्याही कामांची अद्यापही पुर्तता केली नसल्याने वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची २६ जानेवारी रोजी बैठक आयोजित केली होती.हनुमान मंदिरात ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसनासाठी घेतलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी जेएनपीए आणि जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा तीव्र शब्दात निषेध केला. पुनर्वसनासाठी दिलेल्या जागेचे सातबारा उतारे ग्रामस्थांच्या नावे करो अथवा न करो ४ फेब्रुवारीपासून २५६ कुटुंब जसखार व फुंण्डे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मंजूर करण्यात आलेल्या जागेचा ताबा घेऊन स्थलांतर करतील आणि घरे बांधण्यास सुरुवात करतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.अशी माहिती ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मात्र जेएनपीए आणि जिल्हा प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण