शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत... एकवीस वर्षांचा खडतर प्रवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 03:08 IST

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्षे रखडपट्टी झाली. अखेर नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प ...

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्षे रखडपट्टी झाली. अखेर नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प खºया अर्थाने दृष्टिपथात आला आहे.नवी मुंबई विमानतळ २२६८ हेक्टर जागेवर उभारले जात आहे. विमानतळाचे गाभा क्षेत्र ११६१ हेक्टर इतके आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १६००० कोटी रुपये इतका आहे. राज्य शासन आणि सिडको भागीदार असलेल्या नवी मुंबई इंटनॅशनल एअरपोर्ट कंपनीच्या माध्यमातून या विमानतळाची उभारणी केली जाणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रात मैलाचे दगड ठरणाºया या प्रकल्पाच्या कामाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. सर्व प्रथम ९१९७मध्ये या विमानतळाचा विचार पुढे आले. फेब्रुवारी १९९७मध्ये झालेल्या अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र या देशी गुंतवणूकदारांच्या परिषदेत या विमानतळाविषयी सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी म्हणजेच २००६मध्ये या विमानतळाची उपयुक्तता आणि व्यवहार्यता अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक करण्यात आली. २००७मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून या विमानतळ प्रकल्पाला प्रत्यक्ष मंजुरी मिळाली. त्यानंतर भूसंपादन, पुनर्वसन, आवश्यक असलेल्या विविध परवानग्या आदीमुळे प्रकल्पाचे काम रखडले. त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही २०१४पासून झाली. २०१६पासून विमानतळपूर्व कामाला सुरुवात करण्यात आली. तर २०१७मध्ये विमानतळाचा मुख्य ठेकेदार म्हणून जीव्हीके कंपनीची निवड करण्यात आली.विमानतळाची वैशिष्ट्येस्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबई शहरात उभारले जात आहे. या विमानतळावरून प्रतिवर्षी ६0 दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. उद्योगधंदे वाढीस लागणार आहेत. रियल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस येणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई