शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत... एकवीस वर्षांचा खडतर प्रवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 03:08 IST

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्षे रखडपट्टी झाली. अखेर नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प ...

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्षे रखडपट्टी झाली. अखेर नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प खºया अर्थाने दृष्टिपथात आला आहे.नवी मुंबई विमानतळ २२६८ हेक्टर जागेवर उभारले जात आहे. विमानतळाचे गाभा क्षेत्र ११६१ हेक्टर इतके आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १६००० कोटी रुपये इतका आहे. राज्य शासन आणि सिडको भागीदार असलेल्या नवी मुंबई इंटनॅशनल एअरपोर्ट कंपनीच्या माध्यमातून या विमानतळाची उभारणी केली जाणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रात मैलाचे दगड ठरणाºया या प्रकल्पाच्या कामाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. सर्व प्रथम ९१९७मध्ये या विमानतळाचा विचार पुढे आले. फेब्रुवारी १९९७मध्ये झालेल्या अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र या देशी गुंतवणूकदारांच्या परिषदेत या विमानतळाविषयी सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी म्हणजेच २००६मध्ये या विमानतळाची उपयुक्तता आणि व्यवहार्यता अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक करण्यात आली. २००७मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून या विमानतळ प्रकल्पाला प्रत्यक्ष मंजुरी मिळाली. त्यानंतर भूसंपादन, पुनर्वसन, आवश्यक असलेल्या विविध परवानग्या आदीमुळे प्रकल्पाचे काम रखडले. त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही २०१४पासून झाली. २०१६पासून विमानतळपूर्व कामाला सुरुवात करण्यात आली. तर २०१७मध्ये विमानतळाचा मुख्य ठेकेदार म्हणून जीव्हीके कंपनीची निवड करण्यात आली.विमानतळाची वैशिष्ट्येस्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबई शहरात उभारले जात आहे. या विमानतळावरून प्रतिवर्षी ६0 दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. उद्योगधंदे वाढीस लागणार आहेत. रियल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस येणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई