शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

प्रामाणिक भाजी विक्रेते होणार विस्थापित!

By admin | Updated: October 14, 2016 06:56 IST

महापालिकेने बांधलेल्या मार्केटमधील ओटे वाटपाविषयी फेरीवाल्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जे प्रत्यक्षात व्यवसाय करत नाहीत

नवी मुंबई : महापालिकेने बांधलेल्या मार्केटमधील ओटे वाटपाविषयी फेरीवाल्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जे प्रत्यक्षात व्यवसाय करत नाहीत त्यांना ओट्यांचे वाटप केले जात आहे. १५ ते २० वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना बेरोजगार केले जात असल्याचे समोर येवू लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने सीबीडी, सीवूड, नेरूळ, सारसोळे, तुर्भे स्टोअर्स, वाशी व इतर ठिकाणी भाजी व मासळी मार्केट बांधले आहेत. मार्केटमधील गाळे व ओटे वाटपाचे धोरण निश्चित झाले नसल्याने अनेक वर्षांपासून मार्केटच्या इमारती वापराविना पडून होत्या. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्केट सुरू करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. पण ओटे वाटपामध्ये फक्त फेरीवाला परवाना नसल्याचे कारण देवून प्रत्यक्षात व्यवसाय करणाऱ्यांना डावलले जावू लागले आहे. गुरूवारी नेरूळ सेक्टर १८ मधील स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे भाजी मार्केटमधील ओट्याचे वाटप करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली. पालिकेच्या पथकाने सकाळीच घटनास्थळी जाऊन रोडच्या बाजूला असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मार्केटची इमारत बांधताना तेथे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना बाजूच्या भूखंडावर स्थलांतरित केले होते. तेथील भाजी विक्रेत्यांना तेथून जागा खाली करण्याच्या सूचना केल्या आहेत. स्वत: जागा खाली केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. ज्यांच्याकडे फेरीवाल्याचा परवाना आहे त्यांना लॉटरी पद्धतीने मार्केटच्या तळमजल्यावर ओट्यांचे वाटप करण्यात आले. पालिकेने २४ ओटे तयार केले असून १३ ओटेचे वाटप केले आहे. १५ वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्यांना डावलण्यात आले आहे. प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या पाच जणांनाच तेथे ओटे मिळाले आहेत. महापालिकेने मार्केट बांधण्यास सुरुवात केली तेव्हा तेथे प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या सर्व भाजी विक्रेत्यांना नोटीस दिली होती. मार्केटचे बांधकाम झाल्यानंतर सर्वांना ओटे दिले जातील असे आश्वासनही दिले होते. बाजूच्या मोकळ्या भूखंडावर तात्पुरती व्यवस्थाही केली होती. पण प्रत्यक्ष मार्केटचे बांधकाम झाल्यानंतर जे व्यवसाय करत आहेत त्यांना फक्त परवाना नसल्याचे कारण देवून विस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांमध्ये जागा खाली करावी लागणार असल्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागणार आहे. नेरूळप्रमाणेच इतर ठिकाणीही फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेने फेरीवाला परवाना देणे बंद केले आहे. नागरिकांनी परवान्यासाठी अर्ज करूनही त्यांना परवानगी दिली नाही व आता परवानगी नसल्याने कारवाई केली जात असल्याबद्दल फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)