शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक भाजी विक्रेते होणार विस्थापित!

By admin | Updated: October 14, 2016 06:56 IST

महापालिकेने बांधलेल्या मार्केटमधील ओटे वाटपाविषयी फेरीवाल्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जे प्रत्यक्षात व्यवसाय करत नाहीत

नवी मुंबई : महापालिकेने बांधलेल्या मार्केटमधील ओटे वाटपाविषयी फेरीवाल्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जे प्रत्यक्षात व्यवसाय करत नाहीत त्यांना ओट्यांचे वाटप केले जात आहे. १५ ते २० वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना बेरोजगार केले जात असल्याचे समोर येवू लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने सीबीडी, सीवूड, नेरूळ, सारसोळे, तुर्भे स्टोअर्स, वाशी व इतर ठिकाणी भाजी व मासळी मार्केट बांधले आहेत. मार्केटमधील गाळे व ओटे वाटपाचे धोरण निश्चित झाले नसल्याने अनेक वर्षांपासून मार्केटच्या इमारती वापराविना पडून होत्या. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्केट सुरू करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. पण ओटे वाटपामध्ये फक्त फेरीवाला परवाना नसल्याचे कारण देवून प्रत्यक्षात व्यवसाय करणाऱ्यांना डावलले जावू लागले आहे. गुरूवारी नेरूळ सेक्टर १८ मधील स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे भाजी मार्केटमधील ओट्याचे वाटप करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली. पालिकेच्या पथकाने सकाळीच घटनास्थळी जाऊन रोडच्या बाजूला असलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मार्केटची इमारत बांधताना तेथे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना बाजूच्या भूखंडावर स्थलांतरित केले होते. तेथील भाजी विक्रेत्यांना तेथून जागा खाली करण्याच्या सूचना केल्या आहेत. स्वत: जागा खाली केली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. ज्यांच्याकडे फेरीवाल्याचा परवाना आहे त्यांना लॉटरी पद्धतीने मार्केटच्या तळमजल्यावर ओट्यांचे वाटप करण्यात आले. पालिकेने २४ ओटे तयार केले असून १३ ओटेचे वाटप केले आहे. १५ वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्यांना डावलण्यात आले आहे. प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या पाच जणांनाच तेथे ओटे मिळाले आहेत. महापालिकेने मार्केट बांधण्यास सुरुवात केली तेव्हा तेथे प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या सर्व भाजी विक्रेत्यांना नोटीस दिली होती. मार्केटचे बांधकाम झाल्यानंतर सर्वांना ओटे दिले जातील असे आश्वासनही दिले होते. बाजूच्या मोकळ्या भूखंडावर तात्पुरती व्यवस्थाही केली होती. पण प्रत्यक्ष मार्केटचे बांधकाम झाल्यानंतर जे व्यवसाय करत आहेत त्यांना फक्त परवाना नसल्याचे कारण देवून विस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांमध्ये जागा खाली करावी लागणार असल्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागणार आहे. नेरूळप्रमाणेच इतर ठिकाणीही फेरीवाल्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेने फेरीवाला परवाना देणे बंद केले आहे. नागरिकांनी परवान्यासाठी अर्ज करूनही त्यांना परवानगी दिली नाही व आता परवानगी नसल्याने कारवाई केली जात असल्याबद्दल फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)