शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

अभियंत्याच्या बडतर्फीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:15 IST

लोकप्रतिनिधींच्या निर्णयाकडे लक्ष : महासभेचा अधिकार डावलून नेमली होती चौकशी समिती

नवी मुंबई : महासभेचा अधिकार डावलून प्रशासनाने सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्यावर कारवाईसाठी चौकशी समिती नेमली होती. कारवाईसाठीचा प्रस्ताव सभेने फेटाळल्यानंतर तो शासनाकडून विखंडित करून घेतला होता. सभागृहाचा निर्णय मान्य न करणाऱ्या प्रशासनाला न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा तोच ठराव फेरविचारार्थ ठेवण्याची वेळ आली आहे.

महानगरपालिकेच्या विद्युत व मालमत्ता कर विभागात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चौकशी समिती नेमली होती. मुख्य कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी व सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांची चौकशी करण्यात आली होती. वास्तविक हे दोन्ही अधिकारी ‘अ’ वर्ग श्रेणीचे असल्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक होते; परंतु सभेची मंजुरी न घेताच ही समिती नेमण्यात आली. ‘क’ व ‘ड’ वर्ग अधिकाºयांची चौकशी करण्याची व्याप्ती असलेल्या अधिकाºयाला ‘अ’ वर्ग श्रेणीच्या अधिकाºयाची चौकशी करावयास दिली होती. प्रशासनाने चौकशी समिती नेमताना सभागृहाचा अधिकार डावलला असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी राव यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव नामंजूर केला होता. उच्च न्यायालयानेही प्रशासनाने केलेली कारवाई रद्द करून याविषयी प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रशासनाने १९ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव ठेवला आहे. राव यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या विभागीय चौकशीअंती त्यांच्यावरील चारही दोषारोप पूर्णत: सिद्ध झाले असल्याचे म्हटले आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने राव यांच्या शास्तीसंदर्भात यापूर्वी मंजूर केलेला ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींशी विसंगत असल्याने व व्यापक लोकहितास्तव तो शासनाने विखंडित केला असल्याचा उल्लेख प्रशासनाने केला आहे. महासभेचा अधिकार डावलून नेमलेल्या चौकशी समितीवर आधारित कारवाईचा प्रस्ताव लोकप्रतिनिधी मंजूर करणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. सर्वसाधारण सभेच्या अधिकारावर प्रशासन गंडांतर आणत असल्याने सर्वपक्षीय नगरसेवक प्रशासनाला जाब विचारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयुक्तांसह सर्वांच्या मंजुरीनेच कामेविद्युत विभागामधील उपरी वीजवाहिन्या व इतर कामांसाठीचा ठपका सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वास्तविक यामधील कोणताच निर्णय राव यांनी एकट्याने घेतलेला नाही. आयुक्तांच्या परवानगीने सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येतात. निविदा समिती, आयुक्त, सर्वसाधारण सभा, स्थायी समिती यांच्या मंजुरीनंतरच कामे केली जातात. कामे केल्यानंतर मुख्य लेखा वित्त अधिकारी सर्व नियम तपासून आयुक्तांच्या सहीनंतर बिले काढत असतात, असे असताना एकट्या राव यांना जबाबदार कसे धरले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महासभेचा अधिकार का डावललानियमाप्रमाणे चौकशी समिती नेमण्यासाठी महासभेची परवानगी घेणे आवश्यक होते; परंतु महासभेचा अधिकार डावलून समिती नेमण्यात आली. ‘क’ व ‘ड’ वर्गातील अधिकाºयांची चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीची ‘अ’ वर्ग श्रेणीसाठी चौकशी समिती नेमण्यात आली. महासभेने प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर तो शासनाकडून विखंडित करण्यात आला. या सर्व प्रक्रियेमध्ये महापालिकेची बदनामी झाली. या सर्व गोष्टींचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका