शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

अभियंत्याच्या बडतर्फीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:15 IST

लोकप्रतिनिधींच्या निर्णयाकडे लक्ष : महासभेचा अधिकार डावलून नेमली होती चौकशी समिती

नवी मुंबई : महासभेचा अधिकार डावलून प्रशासनाने सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्यावर कारवाईसाठी चौकशी समिती नेमली होती. कारवाईसाठीचा प्रस्ताव सभेने फेटाळल्यानंतर तो शासनाकडून विखंडित करून घेतला होता. सभागृहाचा निर्णय मान्य न करणाऱ्या प्रशासनाला न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा तोच ठराव फेरविचारार्थ ठेवण्याची वेळ आली आहे.

महानगरपालिकेच्या विद्युत व मालमत्ता कर विभागात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चौकशी समिती नेमली होती. मुख्य कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी व सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांची चौकशी करण्यात आली होती. वास्तविक हे दोन्ही अधिकारी ‘अ’ वर्ग श्रेणीचे असल्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक होते; परंतु सभेची मंजुरी न घेताच ही समिती नेमण्यात आली. ‘क’ व ‘ड’ वर्ग अधिकाºयांची चौकशी करण्याची व्याप्ती असलेल्या अधिकाºयाला ‘अ’ वर्ग श्रेणीच्या अधिकाºयाची चौकशी करावयास दिली होती. प्रशासनाने चौकशी समिती नेमताना सभागृहाचा अधिकार डावलला असल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी राव यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव नामंजूर केला होता. उच्च न्यायालयानेही प्रशासनाने केलेली कारवाई रद्द करून याविषयी प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रशासनाने १९ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव ठेवला आहे. राव यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या विभागीय चौकशीअंती त्यांच्यावरील चारही दोषारोप पूर्णत: सिद्ध झाले असल्याचे म्हटले आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने राव यांच्या शास्तीसंदर्भात यापूर्वी मंजूर केलेला ठराव महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींशी विसंगत असल्याने व व्यापक लोकहितास्तव तो शासनाने विखंडित केला असल्याचा उल्लेख प्रशासनाने केला आहे. महासभेचा अधिकार डावलून नेमलेल्या चौकशी समितीवर आधारित कारवाईचा प्रस्ताव लोकप्रतिनिधी मंजूर करणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. सर्वसाधारण सभेच्या अधिकारावर प्रशासन गंडांतर आणत असल्याने सर्वपक्षीय नगरसेवक प्रशासनाला जाब विचारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयुक्तांसह सर्वांच्या मंजुरीनेच कामेविद्युत विभागामधील उपरी वीजवाहिन्या व इतर कामांसाठीचा ठपका सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वास्तविक यामधील कोणताच निर्णय राव यांनी एकट्याने घेतलेला नाही. आयुक्तांच्या परवानगीने सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येतात. निविदा समिती, आयुक्त, सर्वसाधारण सभा, स्थायी समिती यांच्या मंजुरीनंतरच कामे केली जातात. कामे केल्यानंतर मुख्य लेखा वित्त अधिकारी सर्व नियम तपासून आयुक्तांच्या सहीनंतर बिले काढत असतात, असे असताना एकट्या राव यांना जबाबदार कसे धरले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महासभेचा अधिकार का डावललानियमाप्रमाणे चौकशी समिती नेमण्यासाठी महासभेची परवानगी घेणे आवश्यक होते; परंतु महासभेचा अधिकार डावलून समिती नेमण्यात आली. ‘क’ व ‘ड’ वर्गातील अधिकाºयांची चौकशी करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीची ‘अ’ वर्ग श्रेणीसाठी चौकशी समिती नेमण्यात आली. महासभेने प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर तो शासनाकडून विखंडित करण्यात आला. या सर्व प्रक्रियेमध्ये महापालिकेची बदनामी झाली. या सर्व गोष्टींचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका