शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

गौरी-गणपतीला निरोप

By admin | Updated: September 22, 2015 03:54 IST

सोमवारी पाच दिवसांची स्थापना केलेल्या गणरायाला गौरीसह निरोप देण्यात आला. आगमनापासून घरचा सदस्य झालेल्या गणरायालाय निरोप देताना गणेशभक्तांचे मन भरून आले होते

नवी मुंबई : सोमवारी पाच दिवसांची स्थापना केलेल्या गणरायाला गौरीसह निरोप देण्यात आला. आगमनापासून घरचा सदस्य झालेल्या गणरायालाय निरोप देताना गणेशभक्तांचे मन भरून आले होते. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्वच विसर्जन स्थळांवर गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.गुरुवारपासून शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा होत आहे. त्यानुसार घरी तसेच मंडळात स्थापन झालेल्या गणेशमूर्तीची भक्तांकडून मनोभावे सेवा केली जात आहे. त्यामुळे सोमवारी गौरीसोबत विसर्जन होणाऱ्या पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देताना गणेशभक्तांचे डोळे भरून आले होते. पाच दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज होते. या वेळी महापालिका क्षेत्रात २३ ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली होती. मोठ्या मूर्तींसाठी फोर्कलिफ्ट, तराफे यांची सोय करण्यात आली होती तर मूर्तीच्या विसर्जनासाठी सर्वच ठिकाणी स्वयंसेवकही नेमण्यात आले होते. तलावांच्या ठिकाणी गर्दी टळावी यासाठी बॅरिकेटिंग करून त्या ठिकाणी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. भक्तांना पिण्यासाठी पाणी तसेच प्रथमोपचाराचीही सोयदेखील करण्यात आली होती. विसर्जनासाठी केलेली व्यवस्था चोख आहे का हे तपासण्यासाठी पालिका आयुक्त उपआयुक्त तसेच पोलीस आयुक्त व सर्वच उपआयुक्त ठिकठिकाणी भेटी देत होते. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये याकरिता दुपारपासूनच त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. शिवाय विसर्जनमार्गासह विसर्जन स्थळावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून हालचालींवर नजर ठेवण्यात आली. पाचव्या दिवशी विसर्जन होणाऱ्या गणेशमूर्तींमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींचा समावेश असतो. त्यानुसार वाजतगाजत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यायला विसर्जन स्थळापर्यंत गणेशभक्त धाव घेत होते. काहींनी तर केवळ श्रीगणेशाच्या दर्शनासाठी विसर्जन स्थळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मध्यरात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.१उरण शहरातून सुमारे ३५० खासगी गौरी - गणपतींचे उनपच्या विमला तलावात विसर्जन करण्यात आले. उनपनेही गणपती विसर्जनादरम्यान संपूर्ण विमला तलावात विद्युतरोशणाई करून विसर्जनासाठी येणाऱ्यांसाठी स्वागताची जय्यत तयारी केली होती. २ग्रामीण भागातील अनेक गणपतींचे विसर्जन केगाव हद्दीतील माणकेश्वर - दांडा समुद्रकिनारा, पीरवाडी समुद्रात करण्यात आले. माणकेश्वर - दांडा, पीरवाडी समुद्रात दुपारी ३ वाजल्यापासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती. मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच दिवसांच्या गौरी - गणेशमूर्तींचे भवरा तलाव, घारापुरी - मोरा समुद्रात विसर्जन केले. ३जेएनपीटी तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गणेशमूर्तीचे गाव तलावात विसर्जन करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात झालेल्या गौरी - गणपती विसर्जनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने विसर्जन सोहळा शांततेत पार पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.गोठीवली ग्रामस्थांनी पारंपरिक प्रथेचे जतन करत गावातील सुमारे ६५ घरगुती गणेशमूर्तींचे एकत्रित विसर्जन केले. मागील तीन दशकांपासून गोठीवली ग्रामस्थ मंडळाकडून दीड व पाच दिवसांच्या विसर्जनात ही प्रथा जोपासली जात आहे. या वेळी टाळ-मृदुंगांच्या तालावर भजन म्हणत गणरायाला निरोप देण्यात आला. त्यानुसार विसर्जनापूर्वीची महाआरतीदेखील एकत्रितच घेऊन गोठीवली ग्रामस्थांनी आदर्श निर्माण केला.