शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकाजवळील उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:30 IST

राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या स्मारकाजवळील उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. उद्यानामध्ये गवत वाढले असून, मुलांसाठी असलेली खेळणीही तुटलेली असल्यामुळे स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे. रायगड किल्ला, पाचाडचा राजमाता जिजाऊंचा वाडा व इतर कामे केली जाणार आहेत. प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली असली तरी सर्व कामे पूर्ण होण्यास खूप कालावधी लागणार आहे. सद्यस्थितीमध्ये पाचाड येथील राजमाता जिजाऊ स्मारकाची देखभाल पुरातत्त्व विभागाकडून केली जात आहे. या ठिकाणी एक कर्मचाºयाची नियुक्तीही केली आहे. समाधीच्या आवारामध्ये दिवसभर नियमित साफसफाई केली जाते. दिवाबत्तीही वेळेवर केली जात आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून समाधीस्थळापर्यंत साफसफाई केली जाते; पण समाधीच्या बाजूला उभारण्यात आलेल्या उद्यानाची योग्य देखभाल केली जात नाही. उद्यानामध्ये प्रचंड गवत वाढले आहे. बैठक व्यवस्थेसाठीच्या शेडचीही दुरवस्था झाली आहे.

लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानामध्ये खेळणी बसविण्यात आली आहेत. समाधीस्थळ पाहण्यासाठी राज्य व देशाच्या कानाकोपºयामधून नागरिक येत असतात. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते. या सर्वांना काही क्षण विरंगुळा मिळावा, यासाठी हे उद्यान बनविण्यात आले आहे; परंतु त्याची देखभाल करण्यासाठी काहीही व्यवस्था केली जात नाही. वाढलेल्या गवतामुळे उद्यानामध्ये जाताही येत नाही. यामुळे शिवभक्त व येथे येणाºया नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.विधान परिषदेमध्ये उमटले होते पडसादराजमाता जिजाऊ स्मारक परिसराची योग्य देखभाल केली जात नसल्याचे पडसाद अनेक वेळा विधान सभा व विधान परिषदेमध्ये उमटले आहेत. मार्च २०१६ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही या विषयावर आवाज उठवून समाधीस्थळ व परिसराची योग्य देखभाल केली जावी, अशी मागणी केली होती. शिवप्रेमी नागरीकांनी याविषयी आवाज उठविला होता. 

पाचाडमधील राजामाता जिजाऊ समाधीस्थळ हे सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. यामुळे येथे हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. समाधीचे आवार स्वच्छ ठेवले जाते; परंतु बाजूच्या उद्यानाची दुरवस्था झाली असून त्याची योग्य ती देखभाल केली जावी.- रसिका माने, पर्यटक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई