शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

स्मारकाजवळील उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:30 IST

राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या स्मारकाजवळील उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. उद्यानामध्ये गवत वाढले असून, मुलांसाठी असलेली खेळणीही तुटलेली असल्यामुळे स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे. रायगड किल्ला, पाचाडचा राजमाता जिजाऊंचा वाडा व इतर कामे केली जाणार आहेत. प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली असली तरी सर्व कामे पूर्ण होण्यास खूप कालावधी लागणार आहे. सद्यस्थितीमध्ये पाचाड येथील राजमाता जिजाऊ स्मारकाची देखभाल पुरातत्त्व विभागाकडून केली जात आहे. या ठिकाणी एक कर्मचाºयाची नियुक्तीही केली आहे. समाधीच्या आवारामध्ये दिवसभर नियमित साफसफाई केली जाते. दिवाबत्तीही वेळेवर केली जात आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून समाधीस्थळापर्यंत साफसफाई केली जाते; पण समाधीच्या बाजूला उभारण्यात आलेल्या उद्यानाची योग्य देखभाल केली जात नाही. उद्यानामध्ये प्रचंड गवत वाढले आहे. बैठक व्यवस्थेसाठीच्या शेडचीही दुरवस्था झाली आहे.

लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानामध्ये खेळणी बसविण्यात आली आहेत. समाधीस्थळ पाहण्यासाठी राज्य व देशाच्या कानाकोपºयामधून नागरिक येत असतात. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते. या सर्वांना काही क्षण विरंगुळा मिळावा, यासाठी हे उद्यान बनविण्यात आले आहे; परंतु त्याची देखभाल करण्यासाठी काहीही व्यवस्था केली जात नाही. वाढलेल्या गवतामुळे उद्यानामध्ये जाताही येत नाही. यामुळे शिवभक्त व येथे येणाºया नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.विधान परिषदेमध्ये उमटले होते पडसादराजमाता जिजाऊ स्मारक परिसराची योग्य देखभाल केली जात नसल्याचे पडसाद अनेक वेळा विधान सभा व विधान परिषदेमध्ये उमटले आहेत. मार्च २०१६ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही या विषयावर आवाज उठवून समाधीस्थळ व परिसराची योग्य देखभाल केली जावी, अशी मागणी केली होती. शिवप्रेमी नागरीकांनी याविषयी आवाज उठविला होता. 

पाचाडमधील राजामाता जिजाऊ समाधीस्थळ हे सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. यामुळे येथे हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. समाधीचे आवार स्वच्छ ठेवले जाते; परंतु बाजूच्या उद्यानाची दुरवस्था झाली असून त्याची योग्य ती देखभाल केली जावी.- रसिका माने, पर्यटक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई