शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डीपीएस तलाव महापालिकेकडे हस्तांतरणास गणेश नाईक यांची सहमती; पर्यावरणप्रेमी आंदोलनास मिळाले बळ

By नारायण जाधव | Updated: June 28, 2024 15:50 IST

नेरूळ जेट्टीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे जलवाहिनी कोरडी पडल्यानंतर फ्लेमिंगोच्या मृत्यूची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने स्वत:हून दखल घेतल्याने हा तलाव अलीकडेच चर्चेत आला होता.

नवी मुंबई : पाचबीच मार्गावरील ३० एकरातील डीपीएस फ्लेमिंगो तलाव नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांरित करण्यासाठी पर्यावरणवाद्यांच्या मोहिमेला आमदार गणेश नाईक यांनी पाठिंबा दिला आहे. यासाठी स्वत:सुद्धा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली.

नेरूळ जेट्टीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे जलवाहिनी कोरडी पडल्यानंतर फ्लेमिंगोच्या मृत्यूची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने स्वत:हून दखल घेतल्याने हा तलाव अलीकडेच चर्चेत आला होता. या तलावात भरतीचे पाणी येण्यासाठी असलेले सिडकोेने बुजविलेले चोक पॉइंट गणेश नाईक यांनी केेलेल्या आंदोलनानंतर नवी मुंबई महापालिकेने तोडून भरतीचे प्रवाह पूर्ववत केले होते. यामुळे सिडकोने यावरून महापालिकेविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

सिडकोविरोधात तक्रारींचा पाऊस

सिडकोच्या या कृतीविरोधात पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करून सिडकोवर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन गृह सचिव, पर्यावण सचिव, नगरविकास सचिव यांना वेगवेगळ्या प्रकारांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

एनआरआयसह टीएस चाणक्य पाणथळीवर कब्जा

सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे २५ तलाव हस्तांतरित केले आहेत. परंतु डीपीएस आणि एनआरआय फ्लेमिंगो तलावासह एनआरआय व टीएस पाणथळीवर कब्जा केलेला आहे. यात एनआरआय आणि टीएस चाणक्य यांच्या दुहेरी पाणथळ जमिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, सिडकोने डीपीएस तलावावर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे प्रस्तावित केल्याने हा विषयावर पर्यावरणप्रेमींसह लोकप्रतिनिधींत संताप व्यक्त होत आहे.

सरकारकडे पाठपुरावा करणार

नवी मुंबईतील पर्यावरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर बी. एन. कुमार यांनी गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून डीपीएस तलाव संवर्धन आणि देखभालीसाठी महापालिकेकडे सुपुर्द करणे आवश्यक असल्याची मागणी केल्यावर त्यांनी ती मान्य केली. एवढेच नव्हे तर हा तलाव वाचवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांचे कौतुक करून याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन गणेश नाईक यांनी दिले असल्याचे बी. एन. कुमार यांनी सांगितले.