शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; १९ विद्यार्थ्यांचे ५७ लाख हडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 00:30 IST

बोगस एजन्सीच्या तीन संचालकांवर गुन्हा

नवी मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून १९ विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. तब्बल ५७ लाख ५० हजार रुपये घेऊन एस्पाय इंडिया कंपनीचे तीन संचालक फरार झाले असून, त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मनीष रावत, विवेक तिवारी, विवेक कौशिक यांचा समावेश आहे. तिघांनी एस्पाय इंडिया नावाची कंपनी सुरू केली होती. मुंबई एपीएमसी परिसरात एम्बीयन कोर्ट इमारतीमध्ये कार्यालय सुरू केले होते. राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देत असल्याचे त्यांनी भासविले होते. बोरिवलीमध्ये राहणारे जामील खान यांच्या मुलीला एमबीबीएससाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यांनी वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची माहिती घेण्यास सुरुवात केली होती.

एक दिवस त्यांना एस्पाय स्टडी इंडियाच्या कार्यालयामधून फोन आला. नेहा नावाच्या महिलेने आमची कंपनी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे काम करीत असून प्रवेश हवा असल्यास प्रत्यक्ष भेटण्यास सांगितले. २६ आॅगस्टला जामील यांनी कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता त्यांना एमबीबीएसच्या साडेचार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी दहा लाख रुपये फी द्यावी लागेल. सुरुवातीला तीन लाख रुपये एस्पाय इंडियाला धनादेशाद्वारे द्यायचे. वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी पाच लाख ६५ हजार रुपये महाविद्यालयाला धनादेशाद्वारे द्यावे लागतील, असे सांगितले. प्रवेश मिळाल्यानंतर पुन्हा एक लाख ३५ हजार रुपये एस्पाय इंडियाला द्यावे लागतील, असे साांगितले होते.

प्रवेश मिळविण्यासाठी जामील व त्यांच्याप्रमाणेच इतर १९ जणांनी कंपनीच्या नावाने जवळपास तीन लाख रुपयांचा धनादेश दिला होता. यानंतर त्यांना जळगावमधील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे स्पष्ट केले होते. ९ आॅक्टोबरला जळगावमध्ये महाविद्यालयामध्ये भेटण्यास सांगितले होते; परंतु ७ आॅक्टोबरलाच कंपनीचे संचालक मनीष रावत, विवेक तिवारी व विवेक कौशिक यांचे फोन बंद असल्याचे निदर्शनास आले. कंपनीच्या कार्यालयामध्येही कोणीच आढळून आले नाही.

४ लाख ३५ हजार दलाली

एस्पाय स्टडी इंडियाच्या संचालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून चार लाख ३५ हजार रुपये मागितली होती. त्यापैकी तीन लाख प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी व एक लाख ३५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. फसवणूक झालेल्यांच्या पालकांनी जळगावमध्ये महाविद्यालयाशी संपर्क साधला; परंतु संबंधित एजन्सीचा आमचा काहीही संबंध नसल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :fraudधोकेबाजीNavi Mumbaiनवी मुंबई