शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या नोकरी मेळाव्यात चार हजार तरुणांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 02:07 IST

नेमणूक पत्रे दिली: कर्जतसह जिल्ह्यात आणखी मेळावे घेण्यात येणार

कर्जत : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कर्जत तालुक्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ४०० हून अधिक कंपन्यांनी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. तर ४ हजार तरुणांना या मेळाव्यात नोकरीची नेमणूकपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्जतमधील रॉयल गार्डनच्या सभागृहात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी मेळाव्याचे उद्घाटन मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

जितेंद्र पाटील म्हणाले, सुशिक्षित असूनही कोरोना च्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यासाठी आम्ही रोजगार मेळावा आयोजित केला आहे. आम्ही रायगड जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये नोकऱ्या देण्यासाठी पत्रक द्यायला जातो तेव्हा तेथील इतर पक्षांचे नेते मध्यस्थीसाठी येतात. त्यातही ही कंपनी आमच्या अखत्यारीत असल्याचे सांगतात. तसेच इथे लक्ष देऊ नका असे सांगतात. ही नोकऱ्यांची मोठी शोकांतिका आहे. परंतु नोकऱ्या आमच्या हक्काच्या आहेत. यापुढे कंपनी मालक किंवा प्रशासनाने स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाहीत तर पत्रक नसेल थेट उत्तर असेल, असा इशारा जितेंद्र पाटील यांनी दिला.

कर्जतला आणखी मेळावे घेणार असल्याचे आश्वासन मनसेचे नेते शिरीष सावंत यांनी दिले. कर्जतमध्ये अनेक हुशार तरुण मुले आहेत. त्यांना दिशा दाखविणे गरजेचे असून त्यासाठी नोकऱ्या देणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे कर्जतसह जिल्ह्यात असेच आणखी मेळावे घेण्याची गरज असल्याचे शिरीष सावंत यांनी सांगितले. नितीन सरदेसाई यांनी मनोगतात म्हणाले, स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमच्या नेत्यांची असलेली दहशत योग्यच आहे. त्याचे आम्ही समर्थन करतो. तसेच, अनेक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये डावलले जात आहे. त्यासाठी आपण यापूर्वी लढा दिला आहे आणि यापुढेही लढा देत राहू. एकही बेरोजगार राहणार नाही असे काम करणार असल्याचे सांगितले.

या कंपन्यांचा समावेशपेटीएम, फोन पे, भारत पे, आयसीआयसीआय, एक्सिस, कल्पवृक्ष, रिलायन्स ग्रुप, छेडा फाउंडेशन, टेक महिंद्रा, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, भारती एअरटेल, स्नॅपडील, टाटा स्काय, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइज, एचडीएफसी, कोटक महिंद्रा, अक्षय एज्युकेशन इन्स्टिट्यूट आदींसह जवळपास साठ कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. या वेळी १,६२८ उमेदवारांनी अर्ज केले असून, ४ हजार जणांना नेमणूक पत्रे देण्यात आली.