शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्य सरकारने दिली चार एफएसआयला तत्त्वत: मान्यता - मंदा म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:14 IST

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खासगी व सिडकोनिर्मित्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबई :  गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खासगी व सिडकोनिर्मित्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी ४ एफएसआयला तत्त्वत: मान्यता दिल्याचे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. पुनर्विकासासाठी सिडकोने चार एफएसआयचा प्रस्ताव तयार केला असून दोन दिवसांत तो राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.सिडकोने चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची  इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी यापूर्वीच्या सरकारने अडीच एफएसआय जाहीर केला होता. परंतु पुनर्विकासासाठी हा चटई निर्देशांक कमी असल्याने तो चार करावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी लावून धरली होती. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. म्हात्रे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात आपल्या वर्षा निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. सिडकोच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास केल्यास नागरिकांना त्याचा अधिक फायदा होईल, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केले होते. तर सिडकोनेसुद्धा याबाबत सकारात्मक विचार करावा, असे मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांनी या वेळी सूचित केले होते. विशेष म्हणजे या बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्यात आल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी या वेळी दिली. सिडको दोन दिवसांत करणार अहवाल सादरसिडकोने कशा प्रकारे ४ एफएसआय देता येऊ शकतो याचे नियोजन केले असून यासंबंधीचा अहवाल दोन दिवसांत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर चार एफएसआयच्या मागणीवर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला. चाळ‌ीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीसिडकोने चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची अल्पावधीतच पडझड सुरू झाली आहे. यातील बहुतांशी इमारती मोडकळीस आल्या असून महापालिकेने त्या धोकादायक घोषित केल्या आहेत. तसेच खासगी विकासकांनी बांधलेल्या इमारतींचीही दयनीय अवस्था झाली आहे.  वीस वर्षांपासून जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न रेंगाळला आहे. माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आताहा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचे आपल्या इमारतीच्या पुनर्बांधणीचे स्वप्न साकार होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी अडीच एफएसआयला मंजुरी दिली होती. अडीच एफएसआय पुरेसा नसल्याने तो चार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणीच्या पूर्ततेसाठी सकारात्मक कार्यवाही केली आहे.- मंदा म्हात्रे, आमदार

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रेNavi Mumbaiनवी मुंबई