शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

राज्य सरकारने दिली चार एफएसआयला तत्त्वत: मान्यता - मंदा म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:14 IST

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खासगी व सिडकोनिर्मित्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबई :  गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खासगी व सिडकोनिर्मित्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी ४ एफएसआयला तत्त्वत: मान्यता दिल्याचे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. पुनर्विकासासाठी सिडकोने चार एफएसआयचा प्रस्ताव तयार केला असून दोन दिवसांत तो राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.सिडकोने चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची  इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी यापूर्वीच्या सरकारने अडीच एफएसआय जाहीर केला होता. परंतु पुनर्विकासासाठी हा चटई निर्देशांक कमी असल्याने तो चार करावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी लावून धरली होती. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. म्हात्रे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात आपल्या वर्षा निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. सिडकोच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास केल्यास नागरिकांना त्याचा अधिक फायदा होईल, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केले होते. तर सिडकोनेसुद्धा याबाबत सकारात्मक विचार करावा, असे मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांनी या वेळी सूचित केले होते. विशेष म्हणजे या बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्यात आल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी या वेळी दिली. सिडको दोन दिवसांत करणार अहवाल सादरसिडकोने कशा प्रकारे ४ एफएसआय देता येऊ शकतो याचे नियोजन केले असून यासंबंधीचा अहवाल दोन दिवसांत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर चार एफएसआयच्या मागणीवर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला. चाळ‌ीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीसिडकोने चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची अल्पावधीतच पडझड सुरू झाली आहे. यातील बहुतांशी इमारती मोडकळीस आल्या असून महापालिकेने त्या धोकादायक घोषित केल्या आहेत. तसेच खासगी विकासकांनी बांधलेल्या इमारतींचीही दयनीय अवस्था झाली आहे.  वीस वर्षांपासून जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न रेंगाळला आहे. माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आताहा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचे आपल्या इमारतीच्या पुनर्बांधणीचे स्वप्न साकार होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी अडीच एफएसआयला मंजुरी दिली होती. अडीच एफएसआय पुरेसा नसल्याने तो चार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणीच्या पूर्ततेसाठी सकारात्मक कार्यवाही केली आहे.- मंदा म्हात्रे, आमदार

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रेNavi Mumbaiनवी मुंबई