शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नवी मुंबईमध्ये आरोग्य सर्वेक्षणासाठी ७२० पथकांची निर्मिती; दहा दिवसांमध्ये पाच लाख घरांना भेट देण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 00:46 IST

कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नवी मुंबईमध्ये अभियान यशस्वी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी जास्तीत पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेने शहरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यासाठी ७२० पथकांची निर्मिती केली आहे. प्रत्येक पथक प्रतिदिन किमान ५० घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करणार असून, दहा दिवसांमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नवी मुंबईमध्ये अभियान यशस्वी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी जास्तीत पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक पथकामध्ये दोन ते तीन कर्मचारी व स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. हे पथक घरोघरी जाऊन प्रत्येकाचे आॅक्सिजन सॅच्युरेशन व तापमान मोजले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास होत आहे का, हे तपासले जाणार आहे. मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दम अशा सहव्याधी असणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित केली जाणार आहे.नवी मुंबईत १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबरदरम्यान पहिला टप्पा व १४ ते २४ आॅक्टोबरदरम्यान दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणात एखाद्या व्यक्तीस ताप असेल व त्याचे तापमान १००.४ डिग्री फॅरेनाईट, तसेच आॅक्सिजन सॅच्युरेशन ९५ टक्के कमी असल्यास त्या व्यक्तीस नजीकच्या क्लिनिकला पाठविण्यात येणार आहे. या अभियानास नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.सोसायटींमध्ये घ्यावयाची काळजी- सोसायटीमधील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक विनाकारण घराबाहेर जाणार नाहीत, याचीकाळजी घ्यावी.- सोसायटीमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखून संवाद साधावा.- सोसायटीमध्ये बाहेरील व्यक्तीला थेट प्रवेश देऊ नये.- बाहेरून येणाºया व्यक्तीचे तापमान, आॅक्सिजन तपासणी करूनच आतमध्ये प्रवेश द्यावा.खरेदीसाठी जाताना- दुकाने, मंडई, मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना घरातील एकाच व्यक्तीने जावे.- खरेदीसाठी गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थठेवलेल्या वस्तूंना शक्यतो स्पर्शकरणे टाळावे.कार्यालयामध्ये घ्यावयाची काळजी- शक्यतो वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे.- कामावर जाण्यासाठी दुचाकीने जावे किंवा पायी चालत जावे.- बैठकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग पद्धतीचाअवलंब करावा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस