शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

फ्लेमिंगोंच्या विमान अपघातातील मृत्यूची वनविभागाकडून चौकशी

By नारायण जाधव | Updated: May 21, 2024 18:39 IST

अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांची माहिती

नवी मुंबई : दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्सच्या विमानाला घाटकोपर येथे सोमवारी रात्री ८.४० वाजता धडक देऊन ३९ फ्लेमिंगोचा मृत्यूप्रकरणी वनविभागाने तत्काळ चौकशी सुरू केली असल्याचे राज्याचे अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी सांगितले. २० मे रोजी रात्री ८:४० वाजता घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर-पंतनगर भागात विमानाला धडकून फ्लेमिंगाे ३९ पक्षी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी पाेहोचून पाहणी सुरू केली. 

त्यानंतर विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे हे कर्मचाऱ्यांना घेऊन अपघातस्थळाची पाहणी करून २९ मृतपक्षी ताब्यात घेतले. २१ मे रोजी सकाळी पुन्हा पाहणी केली असता आणखी १० मृत पक्षी सापडले. या सर्व मृत पक्ष्यांचे ऐरोलीतील वन विभागाच्या सागरी-किनारी जैवविविधता केंद्रात शवविच्छेदन करण्यात येत आहे.

दीपक खाडेंचे पथक करणार तपासया संपूर्ण घटनेचा तपास विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे करीत असल्याचे रामाराव यांनी स्पष्ट केले आहे. मॅन्ग्रोव्ह समिती २९ मे राेजी करणार डीपीएस तलावाची पाहणी फ्लेमिंगाेचे अधिवास क्षेत्र असलेल्या नवी मुंबईतील ३० एकरांतील डीपीएस तलाव वाचविण्यासाठी नॅट कनेक्टच्या तक्रारीवर मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली मॅन्ग्रोव्ह समिती येत्या २९ मे रोजी या तलावाची तपासणी करणार आहे, तर केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही राज्य पर्यावरण विभागाला चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले असल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

सागर शक्तीचे नंदकुमार पवार यांनी उरण तालुक्यातील बेलपाडा, भेंडखळ आणि पाणजे पाणथळीच्या जागा सिडकोने तथाकथित पायाभूत सुविधांसाठी भाड्याने दिल्याने नष्ट होत असल्याचे सांगितले. याप्रमाणेच खारघरमधील पाणथळींच्या ठिकाणी इतर पक्ष्यांच्या प्रजातींव्यतिरिक्त फ्लेमिंगोदेखील येतात, असे पक्षीप्रेमी ज्योती नाडकर्णी म्हणाल्या. या पक्ष्यांचा त्यांच्या अधिवासावर हक्क आहे, ज्यापैकी मुंबईची खाडी एक महत्त्वाचा भाग आहे, असे खारघरचे कार्यकर्ते नरेशचंद्र सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळforestजंगल