शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठाणे जिल्ह्यांतील २८ ग्रामपंचायतींत प्रथमच दीड काेटी खर्चाचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प

By सुरेश लोखंडे | Updated: April 7, 2023 17:01 IST

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे.

ठाणे : मुंबई, ठाणे महानगरांना लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील गांवखेड्यात कचरा समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी शहरांजवळच्या तब्बल २८ ग्राम पंचायतींमध्ये प्लॅस्टीकची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतले आहे. त्यासाठी तब्बल दीड काेटी रूपये प्रत्येक ग्राम पंचायतीला दिले आहे.

दिवसेंदिवस प्लॅस्टिक वापर वाढत आहे. त्यातून गंभीर समस्य उभी राहत आहे. त्यास वेळीय पायबंद घालण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदे प्रथमच प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावातील रस्त्याच्या कडेला व महामार्गावर प्लॅस्टिक सारख्या घातक कचऱ्याचे व्यवस्थापन प्रक्रीया प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी भिवंडी, अंबरनाथ, शहापूर येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्लॅस्टिकचा पुणर्वापर हा उपक्रम औद्योगिक क्षेत्रात महत्त्वचे योगदान ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रात इंधनाच्या स्वरूपात प्लॅस्टिक वापरले जाणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत प्लास्टिक पासून रस्ता तयार करण्यात येणार आहे.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे. गाव पातळीवर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काल्हेर येथे प्लॅस्टिक व्यवस्थापन केंद्रांची उभारणी हाेत आहे. १५ वित्त आयोगाच्या माध्यमातून २८ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात प्रत्येकी दीड कोटीचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून दिली जात आहे.

असा उभा राहताेय प्रकल्प-

या प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेसाठी पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतींना ८० लाखांच्या निधीतून जागेची हमी घेणे, ५० काचरा वेचक महिलांचे पथक नेमणे व त्यांच्या मार्फत कचरा गोळा करून विघटन करणे, साप करुन, वाळवून, मशीन द्वारे बारीक तुकडे करून प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा परिषद तर्फे पहिल्यांदा प्लॅस्टिक व्यवस्थापनेसाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.