शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

ठाणे जिल्ह्यांतील २८ ग्रामपंचायतींत प्रथमच दीड काेटी खर्चाचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प

By सुरेश लोखंडे | Updated: April 7, 2023 17:01 IST

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे.

ठाणे : मुंबई, ठाणे महानगरांना लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील गांवखेड्यात कचरा समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यास वेळीच पायबंद घालण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी शहरांजवळच्या तब्बल २८ ग्राम पंचायतींमध्ये प्लॅस्टीकची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅस्टीक कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतले आहे. त्यासाठी तब्बल दीड काेटी रूपये प्रत्येक ग्राम पंचायतीला दिले आहे.

दिवसेंदिवस प्लॅस्टिक वापर वाढत आहे. त्यातून गंभीर समस्य उभी राहत आहे. त्यास वेळीय पायबंद घालण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदे प्रथमच प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावातील रस्त्याच्या कडेला व महामार्गावर प्लॅस्टिक सारख्या घातक कचऱ्याचे व्यवस्थापन प्रक्रीया प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी भिवंडी, अंबरनाथ, शहापूर येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्लॅस्टिकचा पुणर्वापर हा उपक्रम औद्योगिक क्षेत्रात महत्त्वचे योगदान ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रात इंधनाच्या स्वरूपात प्लॅस्टिक वापरले जाणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत प्लास्टिक पासून रस्ता तयार करण्यात येणार आहे.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे. गाव पातळीवर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काल्हेर येथे प्लॅस्टिक व्यवस्थापन केंद्रांची उभारणी हाेत आहे. १५ वित्त आयोगाच्या माध्यमातून २८ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात प्रत्येकी दीड कोटीचा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून दिली जात आहे.

असा उभा राहताेय प्रकल्प-

या प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेसाठी पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतींना ८० लाखांच्या निधीतून जागेची हमी घेणे, ५० काचरा वेचक महिलांचे पथक नेमणे व त्यांच्या मार्फत कचरा गोळा करून विघटन करणे, साप करुन, वाळवून, मशीन द्वारे बारीक तुकडे करून प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा परिषद तर्फे पहिल्यांदा प्लॅस्टिक व्यवस्थापनेसाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.