शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
4
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
5
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
6
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
7
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
8
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
9
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
10
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
11
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
12
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
13
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
14
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
15
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
17
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
18
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
19
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"
20
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई!

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडींचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:37 AM

राज्यातील कामगारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पाठपुरावा करत आहे.

नवी मुंबई : राज्यातील कामगारांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन पाठपुरावा करत आहे. २५ सप्टेंबरला होणा-या मेळाव्यामध्येही प्रलंबित प्रश्नांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये प्रत्येक वर्षी २५ सप्टेंबरला अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री, आमदार, खासदार उपस्थित असतात. यामुळे संघटनेच्यावतीने कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठीचे निवेदन देण्यात येते. दोन दशकांमध्ये बहुतांश प्रश्न समान असून ते सोडविण्याकडे शासनाला अपयश येवू लागले आहे. वडाळा येथील घरांचा प्रश्न सोडविण्यात यावा. बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरमधील कामगारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात यावे. माथाडी मंडळांवर कामगारांच्या प्रमाणामध्ये संघटनेच्या सदस्यांची नेमणूक करण्यात यावी. कळंबोली स्टील मार्केट, पुणे गुलटेकडी मार्केट, नाशिक बाजार समिती, मापाडी कामगार व इतर ठिकाणच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.माथाडी कामगार नेते प्रत्येक मेळाव्यामध्ये पोटतिडकीने समस्या मांडतात. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री प्रश्न सोडविण्याची आश्वासने देतात. कामगार टाळ्या वाजवून नेत्यांच्या आश्वासनांचे स्वागत करतात. परंतु प्रत्यक्षात मात्र बहुतांश प्रश्न सुटतच नाहीत. पुन्हा दुसºया वर्षीच्या मेळाव्यात त्याच प्रश्नांचे निवेदन द्यावे लागत आहे. जवळपास २० वर्षे त्याच प्रश्नांचे निवेदन द्यावे लागत असल्याचे आता कामगारांच्याही सर्व मागण्या पाठ होवून गेल्या आहेत. कामगारांचे प्रश्न युद्धपातळीवर सोडविण्यात यावेत, अशी मागणी केली जात असून आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृती होणार का याकडे कामगारांचे लक्ष आहे.पवार, फडणवीस एकत्रराष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थापनेपासून माथाडी कामगार पक्षाबरोबर आहेत. आमदार शशिकांत शिंदे चार वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले असून नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवर पाठविले आहे. परंतु एक वर्षापासून पाटील हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू आहे. माथाडी मेळाव्यामध्ये शरद पवार व देवेंद्र फडणवीस एकत्र येणार असून राजकीयदृष्ट्याही या मेळाव्यास महत्त्व प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस