शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण, चार दिवसांतल्या घटना : फूस लावून पळवल्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:44 IST

शहरातून अवघ्या आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई : शहरातून अवघ्या आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून तीन मुली तर एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतून दोन बहिणींचे अपहरण झाले आहे. ४ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत राहत्या परिसरातून त्या बेपत्ता झाल्या आहेत. शाळेला तसेच सत्संगाला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर गेल्यानंतर त्या परत आलेल्या नाहीत. एपीएमसी आवारात राहणाºया १२ व १४ वर्षे वयाच्या दोन बहिणी शाळेच्या निमित्ताने घरातून बाहेर गेल्या होत्या. मात्र त्यांच्या वडिलांची व शाळेतील शिक्षकांची भेट झाली असता, त्या शाळेत आलेल्या नसल्याचे समजले. दरम्यान, एक दिवस अगोदरच एका मुलीच्या दप्तरामध्ये आयफोन सापडला होता. याबाबत घरच्यांनी चौकशी केली असता, त्यांनी योग्य उत्तर दिले नव्हते. यामुळे वडिलांंनी दप्तर पुन्हा एकदा तपासले असता, एका कागदावर मोबाइल नंबर आढळला. त्यावर संपर्क केला असता, आम्ही संध्याकाळपर्यंत घरी येवू असे सांगून फोन बंद केला. मात्र दुसºया दिवसापर्यंत त्या परत घरी न आल्यामुळे त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे रबाळे एमआयडीसी हद्दीतून तीन मुलींचे अपहरण झाले आहे. १४ ते १७ वयोगटातील या मुली असून त्यापैकी काही जणी पालिका शाळेत शिकणाºया आहेत. शाळेसाठी अथवा सत्संगाच्या बहाण्याने घराबाहेर गेल्यानंतर त्या परत घरी आलेल्या नाहीत. यामुळे त्यांच्या अपहरणप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणNavi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा