शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण, चार दिवसांतल्या घटना : फूस लावून पळवल्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:44 IST

शहरातून अवघ्या आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई : शहरातून अवघ्या आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून तीन मुली तर एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतून दोन बहिणींचे अपहरण झाले आहे. ४ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत राहत्या परिसरातून त्या बेपत्ता झाल्या आहेत. शाळेला तसेच सत्संगाला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर गेल्यानंतर त्या परत आलेल्या नाहीत. एपीएमसी आवारात राहणाºया १२ व १४ वर्षे वयाच्या दोन बहिणी शाळेच्या निमित्ताने घरातून बाहेर गेल्या होत्या. मात्र त्यांच्या वडिलांची व शाळेतील शिक्षकांची भेट झाली असता, त्या शाळेत आलेल्या नसल्याचे समजले. दरम्यान, एक दिवस अगोदरच एका मुलीच्या दप्तरामध्ये आयफोन सापडला होता. याबाबत घरच्यांनी चौकशी केली असता, त्यांनी योग्य उत्तर दिले नव्हते. यामुळे वडिलांंनी दप्तर पुन्हा एकदा तपासले असता, एका कागदावर मोबाइल नंबर आढळला. त्यावर संपर्क केला असता, आम्ही संध्याकाळपर्यंत घरी येवू असे सांगून फोन बंद केला. मात्र दुसºया दिवसापर्यंत त्या परत घरी न आल्यामुळे त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे रबाळे एमआयडीसी हद्दीतून तीन मुलींचे अपहरण झाले आहे. १४ ते १७ वयोगटातील या मुली असून त्यापैकी काही जणी पालिका शाळेत शिकणाºया आहेत. शाळेसाठी अथवा सत्संगाच्या बहाण्याने घराबाहेर गेल्यानंतर त्या परत घरी आलेल्या नाहीत. यामुळे त्यांच्या अपहरणप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणNavi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा