शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:44 IST

जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी

- अनंत पाटीलनवी मुंबई : खाडीकिनारी वाहून येणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकोलमुळे शहरातील पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जलप्रदूषण करणाºया रासायनिक कारखान्यांसह संबंधित घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.पालघरपासून थेट सिंधुदुर्गपर्यंतच्या खोल समुद्रात स्थानिक मच्छीमार मासेमारी करतात. त्यासाठी बोटीतून १० ते १५ दिवस प्रवास करतात; परंतु अलीकडच्या काळात भरतीच्या पाण्याबरोबर माशांऐवजी प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकत आहे, त्यामुळे जाळे फाटून मच्छीमारांचे नुकसान होत आहे. जाळ्यात मासेही सापडत नाहीत आणि नुकसानही होत असल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.समुद्रात तीन प्रकारची मासेमारी केली जाते. डोलनेट, गिलनेट आणि पर्सिनेट अशा प्रकारे असून, डोलनेट म्हणजे स्थित मासेमारी प्रकारात पारंपरिक पद्धतीने लहान बोटीतून दररोज मासेमारी केली जाते. गिलनेट बोटीतून चार ते पाच दिवसांचा प्रवास करून मासेमारी केली जाते. तर पर्सिनेट मासेमारी ट्रॉलर बोटीतून १० ते १५ दिवसांचा प्रवास करून खोल समुद्रात मासेमारी केली जाते. यात दररोज मासेमारी करणाºया डोलनेट मच्छीमारांना प्लॅस्टिक आणि थर्माकोल कचºयाचा मोठा फटका बसत आहे.निवठ्या, खेकडे, आंग्रे, थिरले, खरबी मासे आणि लहान कोळंबी (जवळा) हा मासळीचा प्रकार खाडीकिनारी चिखलात सापडतो; पण प्लॅस्टिक, थर्माकोल तसेच पाण्यावर पसरणारे तेलाचे तवंग आदीमुळे ही मासळी मिळणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे.त्यामुळे आणि भरतीबरोबर तेलतवंगामुळे ही मासळी फारशी मिळत नाही. अंडी उबविण्यासाठी ही मासळी मार्च आणि एप्रिलमध्ये खोल समुद्रात जाते, त्यानंतर पावसाळ्यात किनाºयावर येते. मात्र, किनाºयावर वाहून येणाºया प्लॅस्टिक व थर्माकोलच्या कचºयामुळे यामाशांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. प्रभावी कार्यवाही केल्यास समुद्र आणि खाडीत आढळणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकॉलच्या कचºयाला आळा बसेल. तसेच प्रक्रिया न करता रासायनमिश्रीत पाणी खाडीत सोडणाºया कारखान्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांची मागणी आहे. विशेष म्हणजे, खाडी आणि समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे, त्यामुळे मासळीच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.रायगडच्या किनारपट्टीसह ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील स्थानिकांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसायआहे; परंतु हा व्यवसायही आता संकटात सापडल्याने खाडी आणि समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारNavi Mumbaiनवी मुंबई