शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:44 IST

जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी

- अनंत पाटीलनवी मुंबई : खाडीकिनारी वाहून येणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकोलमुळे शहरातील पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जलप्रदूषण करणाºया रासायनिक कारखान्यांसह संबंधित घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.पालघरपासून थेट सिंधुदुर्गपर्यंतच्या खोल समुद्रात स्थानिक मच्छीमार मासेमारी करतात. त्यासाठी बोटीतून १० ते १५ दिवस प्रवास करतात; परंतु अलीकडच्या काळात भरतीच्या पाण्याबरोबर माशांऐवजी प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकत आहे, त्यामुळे जाळे फाटून मच्छीमारांचे नुकसान होत आहे. जाळ्यात मासेही सापडत नाहीत आणि नुकसानही होत असल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.समुद्रात तीन प्रकारची मासेमारी केली जाते. डोलनेट, गिलनेट आणि पर्सिनेट अशा प्रकारे असून, डोलनेट म्हणजे स्थित मासेमारी प्रकारात पारंपरिक पद्धतीने लहान बोटीतून दररोज मासेमारी केली जाते. गिलनेट बोटीतून चार ते पाच दिवसांचा प्रवास करून मासेमारी केली जाते. तर पर्सिनेट मासेमारी ट्रॉलर बोटीतून १० ते १५ दिवसांचा प्रवास करून खोल समुद्रात मासेमारी केली जाते. यात दररोज मासेमारी करणाºया डोलनेट मच्छीमारांना प्लॅस्टिक आणि थर्माकोल कचºयाचा मोठा फटका बसत आहे.निवठ्या, खेकडे, आंग्रे, थिरले, खरबी मासे आणि लहान कोळंबी (जवळा) हा मासळीचा प्रकार खाडीकिनारी चिखलात सापडतो; पण प्लॅस्टिक, थर्माकोल तसेच पाण्यावर पसरणारे तेलाचे तवंग आदीमुळे ही मासळी मिळणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे.त्यामुळे आणि भरतीबरोबर तेलतवंगामुळे ही मासळी फारशी मिळत नाही. अंडी उबविण्यासाठी ही मासळी मार्च आणि एप्रिलमध्ये खोल समुद्रात जाते, त्यानंतर पावसाळ्यात किनाºयावर येते. मात्र, किनाºयावर वाहून येणाºया प्लॅस्टिक व थर्माकोलच्या कचºयामुळे यामाशांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. प्रभावी कार्यवाही केल्यास समुद्र आणि खाडीत आढळणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकॉलच्या कचºयाला आळा बसेल. तसेच प्रक्रिया न करता रासायनमिश्रीत पाणी खाडीत सोडणाºया कारखान्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांची मागणी आहे. विशेष म्हणजे, खाडी आणि समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे, त्यामुळे मासळीच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.रायगडच्या किनारपट्टीसह ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील स्थानिकांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसायआहे; परंतु हा व्यवसायही आता संकटात सापडल्याने खाडी आणि समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारNavi Mumbaiनवी मुंबई