शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:44 IST

जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी

- अनंत पाटीलनवी मुंबई : खाडीकिनारी वाहून येणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकोलमुळे शहरातील पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जलप्रदूषण करणाºया रासायनिक कारखान्यांसह संबंधित घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.पालघरपासून थेट सिंधुदुर्गपर्यंतच्या खोल समुद्रात स्थानिक मच्छीमार मासेमारी करतात. त्यासाठी बोटीतून १० ते १५ दिवस प्रवास करतात; परंतु अलीकडच्या काळात भरतीच्या पाण्याबरोबर माशांऐवजी प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकत आहे, त्यामुळे जाळे फाटून मच्छीमारांचे नुकसान होत आहे. जाळ्यात मासेही सापडत नाहीत आणि नुकसानही होत असल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.समुद्रात तीन प्रकारची मासेमारी केली जाते. डोलनेट, गिलनेट आणि पर्सिनेट अशा प्रकारे असून, डोलनेट म्हणजे स्थित मासेमारी प्रकारात पारंपरिक पद्धतीने लहान बोटीतून दररोज मासेमारी केली जाते. गिलनेट बोटीतून चार ते पाच दिवसांचा प्रवास करून मासेमारी केली जाते. तर पर्सिनेट मासेमारी ट्रॉलर बोटीतून १० ते १५ दिवसांचा प्रवास करून खोल समुद्रात मासेमारी केली जाते. यात दररोज मासेमारी करणाºया डोलनेट मच्छीमारांना प्लॅस्टिक आणि थर्माकोल कचºयाचा मोठा फटका बसत आहे.निवठ्या, खेकडे, आंग्रे, थिरले, खरबी मासे आणि लहान कोळंबी (जवळा) हा मासळीचा प्रकार खाडीकिनारी चिखलात सापडतो; पण प्लॅस्टिक, थर्माकोल तसेच पाण्यावर पसरणारे तेलाचे तवंग आदीमुळे ही मासळी मिळणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे.त्यामुळे आणि भरतीबरोबर तेलतवंगामुळे ही मासळी फारशी मिळत नाही. अंडी उबविण्यासाठी ही मासळी मार्च आणि एप्रिलमध्ये खोल समुद्रात जाते, त्यानंतर पावसाळ्यात किनाºयावर येते. मात्र, किनाºयावर वाहून येणाºया प्लॅस्टिक व थर्माकोलच्या कचºयामुळे यामाशांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. प्रभावी कार्यवाही केल्यास समुद्र आणि खाडीत आढळणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकॉलच्या कचºयाला आळा बसेल. तसेच प्रक्रिया न करता रासायनमिश्रीत पाणी खाडीत सोडणाºया कारखान्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांची मागणी आहे. विशेष म्हणजे, खाडी आणि समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे, त्यामुळे मासळीच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.रायगडच्या किनारपट्टीसह ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील स्थानिकांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसायआहे; परंतु हा व्यवसायही आता संकटात सापडल्याने खाडी आणि समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारNavi Mumbaiनवी मुंबई