शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

अर्थसंकल्पावरील चर्चेचा पहिला दिवस व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 7:07 AM

अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीमध्ये काहीच चर्चा झाली नाही. अधिका-यांकडून उत्पन्नाचे आकडे समजून घेतल्यानंतर सभा संपविण्यात आल्याने पूर्ण दिवस व्यर्थ गेला.

नवी मुंबई - अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीमध्ये काहीच चर्चा झाली नाही. अधिकाºयांकडून उत्पन्नाचे आकडे समजून घेतल्यानंतर सभा संपविण्यात आल्याने पूर्ण दिवस व्यर्थ गेला.आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी २०१८ - १९ वर्षासाठी ३१५१ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक २० फेब्रुवारीला स्थायी समितीमध्ये सादर केले. या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी तब्बल १२ दिवसानंतर ५ ते ८ मार्च दरम्यान विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी जमेच्या बाजूवर चर्चा होणार होती. सभेचे कामकाज दिवसभर चालविणे आवश्यक होते, परंतु सदस्यांनी सुरुवातीला प्रत्येक विभागवार किती जमा होणार आहे याचे तपशील विभाग प्रमुखांना सादर करण्यास सांगितले.मुख्य लेखा व वित्त अधिका-यांसह शहर अभियंता व आरोग्य विभागापर्यंत सर्व विभागप्रमुखांनी आर्थिक वर्षामध्ये किती रक्कम जमा होणार याची माहिती सादर करण्यास सांगितले. अधिकाºयांनीही अंदाजपत्रकामध्ये दिलेली रक्कम वाचून दाखविली. यावर काही किरकोळ प्रश्न उपस्थित करण्यात आले. दोन तास सर्व विभागनिहाय माहिती मागविल्यानंतर सभेचे कामकाज संपविण्यात आले. वास्तविक अर्थसंकल्पावरील चर्चा दिवसभर चालेल हे गृहीत धरून सदस्यांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. पण काही सदस्यांच्या निरुत्साहामुळे व निरर्थक प्रश्न उपस्थित करण्याच्या धोरणामुळे चर्चेचा एक दिवस व्यर्थ गेला.स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर अनेक सदस्यांनी ज्येष्ठ सदस्यांविषयीही नाराजी व्यक्त केली. अनेक सदस्यांनी जमेच्या बाजूवर चर्चा करण्यासाठी मुद्दे तयार केले होते, परंतु चर्चाच होवू शकली नाही. पूर्ण दिवस व्यर्थ गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.वास्तविक आयुक्तांनी त्यांचे मुद्दे मांडले आहेत.अर्थसंकल्प सादर करताना पैसे कसे येणार याची सविस्तर माहिती दिली आहे. सदस्यांना अभ्यास करण्यासाठी १२ दिवसांची संधी दिली होती. यानंतर चर्चेच्या पहिल्याच दिवशी निरर्थक प्रश्न उपस्थित करण्यात आले.स्थायी समितीमध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्पावर एवढी निरर्थक चर्चा झाल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले. काही सदस्यांनी याविषयी सांगितले की, प्रशासनाने त्यांचे आकडे दिले आहेत. तेच आकडे पुन्हा वदवून घेण्यात काहीही अर्थ नाही. जमा व खर्चाच्या मुद्यावर सविस्तर तपशीलवार चर्चा व्हावी व सर्वांना चर्चा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.७ मार्चला सभा : अर्थसंकल्पावर ५ ते ७ मार्चपर्यंत तीन दिवस विशेष सभेचे आयोजन केले होते. यामधील पहिला दिवस व्यर्थ गेला असून ६ तारखेला सभा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ७ मार्चला सभा होणार असून एक दिवसात जमा व खर्चावर चर्चा होणार की चर्चेचे दिवस वाढविले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका