शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

रसायनांबाबत अग्निशमन अधिकारीच अनभिज्ञ, दुर्घटनेवेळी घालावा लागतोय जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 05:40 IST

Fire News : एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये साठा असलेल्या रसायनांबाबत स्थानिक अग्निशमन केंद्र अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे तळोजासारख्या दुर्घटनेवेळी अग्निशमन जवानांना जीव धोक्यात घालावा लागला होता.

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये साठा असलेल्या रसायनांबाबत स्थानिक अग्निशमन केंद्र अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे तळोजासारख्या दुर्घटनेवेळी अग्निशमन जवानांना जीव धोक्यात घालावा लागला होता.औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये साठा असलेल्या रसायनांची माहिती अग्निशमन केंद्रांकडे उपलब्ध नाही. यामुळे आगीची घटना घडल्यास त्या ठिकाणी बचावकार्य करताना अडथळे येत आहेत. तर आगीत नेमके कोणते रसायन जळत आहे याची माहिती नसल्याने जीव धोक्यात घालावा लागत आहे. अशाच प्रकारातून तळोजा येथील मोदी कंपनीची आग विझविताना विषारी वायूची बाधा होऊन अग्निशमन जवान बाळू देशमुख यांना जीव गमवावा लागला आहे.दरम्यान, कंपनीतील क्लोरिनचे टनेल व पाचशे किलोहून अधिक ब्रोमिनचा साठा आगीत सापडला असता तर तळोजासह लगतच्या परिसराला धोका होता. त्यामध्ये भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली असती. ते टाळण्यासाठी तळोजा अग्निशमन अधिकारी दीपक दोरगुडे व त्यांच्या जवानांसह मदतीला आलेल्या इतर अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून संभाव्य दुर्घटना टाळली. मात्र कंपनीतल्या घातक रसायनांची पूर्वकल्पना अग्निशमन केंद्राला असती तर बचाव कार्य निर्विघ्न झाले असते. परंतु राज्यातल्या सर्वच औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या चाचणीचे अधिकार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (डिस्ट) यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडून स्थानिक अग्निशमन केंद्राला कंपन्यांमधील रासायनिक साठ्याबद्दल कल्पना दिली जात नाही. परिणामी, एखाद्या कंपनीत आगीची दुर्घटना घडल्यास, जीव धोक्यात घालून बचावकार्य करावे लागत आहे. तळोजा दुर्घटनेच्या निमित्ताने विभागीय चौकशी केली जाणार आहे. सुधारित कायद्यानुसार औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या चाचणीचे अधिकार ‘डिस्ट’कडे आहेत. त्यामुळे कंपन्यांमधील रासायनिक साठ्याबद्दल अग्निशमन केंद्राकडे माहिती उपलब्ध नसते.- एम. व्ही. ओगले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, राज्य. 

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलNavi Mumbaiनवी मुंबई