शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अग्निशमनचे कर्मचारीच आपत्कालीन परिस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 02:37 IST

शासनाच्या उदासीनतेमुळे वाशी अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासह जीविताला धोका निर्माण झाला आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वाशी अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासह जीविताला धोका निर्माण झाला आहे. मूळ जागेत अग्निशमन केंद्राच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असल्याने मागील तीन वर्षांपासून तात्पुरत्या जागेत हे केंद्र स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी गैरसोयींचे भांडार असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालिकेतर्फे वाशीतील अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांपासून मोकळ्या जागेत शेडखाली अग्निशमन केंद्राची तात्पुरती सोय करण्यात आलेली आहे. या कालावधीत दोनदा जागा बदलण्यात आली असून, सद्यस्थितीला पोस्ट कार्यालयासमोरील जागेत हे केंद्र चालत आहे. मात्र, त्या ठिकाणी प्रशासनाकडून आवश्यक सुविधा पुरवण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत असून जीवालाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे आपत्कालीन प्रसंगी नागरिकांच्या मदतीला धाव घेणारे अग्निशमनचे कर्मचारीच आपत्कालीन परिस्थितीत अडकले आहेत. कर्मचाºयांना पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्यात आला आहे. मात्र, त्या ठिकाणी पाणी पिताना तो घोट शेवटचाही ठरू शकतो. कर्मचाºयांना वापराच्या पाण्यासाठी सुमारे दहा फुटांवर बसवण्यात आलेल्या पाण्याच्या टाकी खाली हा प्युरिफायर बसवलेला आहे. तीन महिन्यांपासून सदर टाकीला गळती लागली असून, २४ तास त्यामधून पाण्याचे फवारे सुरू असता, हे पाणी त्या ठिकाणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरवर तसेच उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरवर उडत असते. यामुळे त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी गेलेल्या कर्मचाºयाला शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर वॉटर प्युरिफायरची दोन वर्षांपासून स्वच्छताच झालेली नसल्याचेही कर्मचाºयांचे म्हणने आहे. परिणामी, सर्वच बाजूने कर्मचाºयांवर संकटांची टांगती तलवार लटकत असल्याचे दिसून येत आहे. गतमहिन्यात त्या ठिकाणी एका मनोरुग्ण व्यक्तीचे प्राणही गेले आहेत. नाट्यगृहाला वीजपुरवठा करणारा महावितरणचा विद्युत ट्रान्सफॉर्मर उघड्यावर पडलेला आहे. यामुळे उंचावरील टाकीतून उडणाºया पाण्याच्या फवाºयामुळे आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.कर्मचाºयांच्या बैठकीसाठी तसेच दैनंदिन कामकाजासाठी कंटेनर केबीन ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एका कंटेनरमध्ये शौचालयाची सोय करण्यात आली आहे. मात्र, त्यातून सांडणारे मलमिश्रीत पाणी परिसरात वाहत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. शिवाय त्यामध्ये वाढणाºया डास व माश्यांमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.यासंदर्भात कर्मचाºयांनीतक्रार केली असता, त्यांना भावे नाट्यगृहाचे शौचालय वापरण्यास सांगण्यात आले होते. मात्र, पाच महिन्यांपासून नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने अग्निशमनच्या कर्मचाºयांच्या शौचालयाचीही गैरसोय झाली आहे. त्या ठिकाणीएका शिपला सुमारे १५ कर्मचारी कर्तव्यावर असतात, त्यासर्वांना नाइलाजास्तव कंटेनरमधील गळते शौचालयच वापरावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबाबत कर्मचाºयांकडून नाराजी व्यक्त होत आहे.शेडवर लाखोंचा खर्चऊन व पावसापासून सुरक्षेसाठी त्या ठिकाणी संपूर्ण जागेत प्लॅस्टिकचे शेड उभारण्यात आले आहे. त्याकरिता वर्षभरापासून प्रतिमहिना एक लाख रुपये भाडे दिले जात असल्याचे समजते. त्याऐवजी जर पालिकेनेच स्वखर्चातून हे शेड उभारले असते, तर निम्याहून कमी खर्च आला असता; परंतु कर्मचाºयांच्या सोयींकडे दुर्लक्ष करणारे वरिष्ठ अधिकारी इतर खर्चांसाठी मात्र प्रशासनाची तिजोरी खुली करत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.पाणी फवाºयामुळे आगीचा धोकाकर्मचाºयांना वापराच्या पाण्यासाठी सुमारे दहा फूट उंचावर टाकी बसवण्यात आली आहे. तीन महिन्यांपासून या फुटलेल्या टाकीतून पाण्याचे फवारे उडत आहेत.ते पाणी बाजूच्या महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरपर्यंत उडत आहे, यामुळे त्या ठिकाणी आगीचा धोका निर्माण झाला असून, तसे घडल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई