शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

फटाक्यामुळे दोन ठिकाणी आग

By admin | Updated: November 12, 2015 02:09 IST

दिवाळीतील फटाक्यांमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमधील बदामच्या गाळ्याला मंगळवारी रात्री आग लागली. गाळ्यांवरील शेड जळून खाक झाले

नवी मुंबई : दिवाळीतील फटाक्यांमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमधील बदामच्या गाळ्याला मंगळवारी रात्री आग लागली. गाळ्यांवरील शेड जळून खाक झाले. बुधवारी सकाळी तुर्भे डम्पिंग ग्राउंडवरील वृक्षाच्या फांद्या व पाल्याला आग लागली सायंकाळपर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते. मसाला मार्केटमधील जी ३६ गाळ्याच्या छताला फटाक्यामुळे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागली. मार्केटध्ये रॉकेट उडविण्यात येत होती. त्यामधील एक छतावर पडल्याने तेथील बदामाचा भुसा व लागडांनी तत्काळ पेट घेतला. आगीमध्ये टेरेसवर टाकलेले शेड पूर्णपणे जळून खाक झाले आहे. बदाम फोडण्याची तीन मशीन जळून गेल्या आहेत. छतावर ठेवलेल्या भुशाच्या गोणी जळून खाक झाल्या आहेत. व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे छतावर लाकडी शेड टाकल्यामुळे पाच गाळ्यांवरील शेड जळून गेल्या. नवी मुंबई, ठाण्यामधील अग्निशमन दलाच्या वाहने तत्काळ घटनास्थळी जाऊन आग विझविण्यास सुरुवात केली. वेळेत आग विझविली नसती, तर पूर्ण जी विंग जळून खाक झाली असती. आग लागलेल्या दुकानासमोरच फटाक्यांचे स्टॉल आहेत. आगीमुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली होती. तत्काळ सर्व फटाके बाजूला काढून ठेवण्यात आले. महापालिकेच्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडवरही सकाळी फटाक्यामुळे आग लागली. शहरातील वृृक्षांची छाटनी केल्यानंतर निर्माण होणारा कचरा एक कोपऱ्यात टाकण्यात येतो. रोज जवळपास २० टन फांद्या व त्याचा पाला डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे. आगीमध्ये हा कचरा पूर्णपणे जळून गेला आहे. नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु प्रचंड धूर असल्यामुळे आग विझविण्यात अडथळे निर्माण होत होते. जेसीबीच्या सहाय्याने माती टाकत अग्निशमन दलाची वाहनांना मार्ग करून देण्यात आला. सायंकाळपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. तर फटाका स्टॉल जळाले असतेबाजारसमितीमध्ये आग लागलेल्या गाळ्यासमोर नाल्याच्या कडेला शहरातील फटाके विक्रेत्यांचे स्टॉल्स आहेत. गाळ्यात ठेवलेला भुसा व शेडच्या लागडांनी पेट घेतला. आगीच्या ठिणग्या उडू लागल्यामुळे, फटाका स्टॉल्सना आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. फटाके विक्रेत्यांनी तत्काळ सर्व माल बाजूला काढून ठेवण्यास सुरुवात केली, परंतु अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दक्षता दाखविल्यामुळे मोठी दुर्घटना घडली.