शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मसाला मार्केटमधील गोडाऊनला आग; १५ तास आग विझविण्याचे काम सुरू; अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या

By नामदेव मोरे | Updated: July 17, 2023 21:42 IST

सायंकाळी ७ पर्यंत अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील कुलस्वामीनी फुड्स या सुकामेव्याच्या गोडाऊनला पहाटे आग लागली. दिवसभर आग विझविण्याचे काम सुरू होते. १५ तासानंतरही गोडाऊनमधून धूर येत होता. सायंकाळी ७ पर्यंत अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या.

मसाला मार्केटमधील एच २३ या गोडाऊनमध्ये पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोड व इतर सुकामेवा साठविण्यात आला होता. आक्रोडने क्षणात पेट घेतल्यामुळे आग संपूर्ण गाळ्यात पसरली. बाजार समिती सुरक्षा रक्षकांनी अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर तत्काळ वाशी अग्निशमन दलाची वाहने आग विझविण्यासाठी मार्केटमध्ये दाखल झाली. पाण्याचा वापर करून आग विझविली जात होती. परंतू आक्रोडचे तेल निघाल्यामुळे आग सारखी भडकत होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच होते. आगीमुळे गाळ्याचे व आतमधील साहित्याचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले होते. १५ तास सुरू असलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या टँकरच्या ३३ फेऱ्या झाल्या होत्या.

मसाला मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे एच विंगमधील विजपुरवठा दिवसभर खंडीत करण्यात आला होता. येथील व्यापारावरही परिणाम झाला होता. बाजार समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन -बाजार समितीमध्ये अग्निशमन दलाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. यापुर्वी फळ मार्केटमध्ये लागलेल्या आगीनंतर एक समितीही नियुक्त केली होती. या समितीने सर्व मार्केटमध्ये काय उपाययोजना करायच्या याविषयी अहवाल दिला होता. परंतु व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे आग लागल्यानंतर ती वेळेत नियंत्रणात आणण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलNavi Mumbaiनवी मुंबई