शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये अग्नितांडव; २५ हून अधिक गाळे खाक, अवैध गोडाऊन दुर्घटनांना कारणीभूत 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 17, 2022 21:10 IST

एपीएमसीच्या फळ मार्केट मध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एपीएमसीच्या फळ मार्केट मध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. गाळ्यांलगतच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात साठवलेल्या पुठ्यांमुळे हि दुर्घटना घडली. हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे दोन शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नसून गाळ्यांमधील मालाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

फळ मार्केट मधील एन गल्लीत संध्याकाळी ४.२० च्या सुमारास हि घटना घडली. त्याठिकाणी व्यापारी गाळे व सुरक्षा भिंत यामधील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे व प्लास्टिकचे क्रेट साठवण्यात आले होते. त्याठिकाणी अज्ञाताने पेटते सिगारेट टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातूनच लागलेल्या छोट्या आगीचा काही क्षणातच मोठा भडका उडाला. यामुळे त्याठिकाणच्या व्यापारी व कामगारांची पळापळ झाली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या वाशीसह सर्वच अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या दोन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर संध्याकाळी सहाच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र कुलींगचे काम पुढील दिड तास सुरु होते. व्यापारी गाळ्यांच्या पोटमाळ्यावर देखील साहित्य असल्याने, प्रत्येक गाळ्याच्या वरच्या भागावर जाऊन पाण्याचा मारा करावा लागत होता. परंतु संपूर्ण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेले कागदी पुठ्ठे व इतर साहित्यांमुळे अग्निशमन जवानांना आग वीजवण्यात तारेवरची कसरत करावी लागली. 

काही मिनिटातच आगीने रौद्रय रूप धारण केल्याने त्याठिकाणी हजारोच्या संख्येत कामगार जमले होते. व्यापारी गाळ्यांमध्ये अथवा उघड्यावर शेड उभारून आश्रयाला असलेल्या कामगारांच्या वापराचे गॅस सिलेंडर देखील त्याठिकाणी होते. आगीमुळे त्यांचा स्फोट झाल्यास इमारतीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे आग वीजवण्याचे काम सुरु असतानाच त्याठिकाणचे पुठ्ठे व सिलेंडर तातडीने हटवण्यात आले. या आगीत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. मात्र आग लागल्यानंतर झालेल्या पळापळीत काही कामगारांनी वरून उड्या मारल्याचे समजते. आगीमध्ये त्याठिकाणची २५ हुन अधिक गाळे जळून खाक झाले आहेत. यामध्ये त्याठिकाणी साठवण्यात आलेल्या कोट्यवधींच्या फळमालाचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच एपीएमसी प्रश्नाचे अधिकारी व पोलीस यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.

एपीएमसी आवारात यापूर्वी देखील अनेकदा आग लागल्याची घटना घडली आहे. तर गुरुवारी ज्याठिकाणी आग लागली त्याच ठिकाणी यापूर्वी देखील कागदी पुठ्ठयांमुळेच आग लागल्याची घटना घडलेली आहे. त्यानंतर गाळ्याभवती पुठ्ठयांची साठवणूक करण्याला मनाई केल्यानंतरही जागोजागी त्यांचा साठा केलेला आहे. त्यासाठी प्लास्टिकचे शेड उभारण्यात आले आहेत. हेच प्लास्टिक पेटल्याने काही क्षणात आग इतरत्र पसरली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग