शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये अग्नितांडव; २५ हून अधिक गाळे खाक, अवैध गोडाऊन दुर्घटनांना कारणीभूत 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: November 17, 2022 21:10 IST

एपीएमसीच्या फळ मार्केट मध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : एपीएमसीच्या फळ मार्केट मध्ये आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. गाळ्यांलगतच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात साठवलेल्या पुठ्यांमुळे हि दुर्घटना घडली. हि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे दोन शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आगीमध्ये कोणीही जखमी झालेले नसून गाळ्यांमधील मालाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

फळ मार्केट मधील एन गल्लीत संध्याकाळी ४.२० च्या सुमारास हि घटना घडली. त्याठिकाणी व्यापारी गाळे व सुरक्षा भिंत यामधील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे व प्लास्टिकचे क्रेट साठवण्यात आले होते. त्याठिकाणी अज्ञाताने पेटते सिगारेट टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातूनच लागलेल्या छोट्या आगीचा काही क्षणातच मोठा भडका उडाला. यामुळे त्याठिकाणच्या व्यापारी व कामगारांची पळापळ झाली. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या वाशीसह सर्वच अग्निशमन केंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या दोन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर संध्याकाळी सहाच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र कुलींगचे काम पुढील दिड तास सुरु होते. व्यापारी गाळ्यांच्या पोटमाळ्यावर देखील साहित्य असल्याने, प्रत्येक गाळ्याच्या वरच्या भागावर जाऊन पाण्याचा मारा करावा लागत होता. परंतु संपूर्ण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात साठवण्यात आलेले कागदी पुठ्ठे व इतर साहित्यांमुळे अग्निशमन जवानांना आग वीजवण्यात तारेवरची कसरत करावी लागली. 

काही मिनिटातच आगीने रौद्रय रूप धारण केल्याने त्याठिकाणी हजारोच्या संख्येत कामगार जमले होते. व्यापारी गाळ्यांमध्ये अथवा उघड्यावर शेड उभारून आश्रयाला असलेल्या कामगारांच्या वापराचे गॅस सिलेंडर देखील त्याठिकाणी होते. आगीमुळे त्यांचा स्फोट झाल्यास इमारतीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे आग वीजवण्याचे काम सुरु असतानाच त्याठिकाणचे पुठ्ठे व सिलेंडर तातडीने हटवण्यात आले. या आगीत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. मात्र आग लागल्यानंतर झालेल्या पळापळीत काही कामगारांनी वरून उड्या मारल्याचे समजते. आगीमध्ये त्याठिकाणची २५ हुन अधिक गाळे जळून खाक झाले आहेत. यामध्ये त्याठिकाणी साठवण्यात आलेल्या कोट्यवधींच्या फळमालाचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच एपीएमसी प्रश्नाचे अधिकारी व पोलीस यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.

एपीएमसी आवारात यापूर्वी देखील अनेकदा आग लागल्याची घटना घडली आहे. तर गुरुवारी ज्याठिकाणी आग लागली त्याच ठिकाणी यापूर्वी देखील कागदी पुठ्ठयांमुळेच आग लागल्याची घटना घडलेली आहे. त्यानंतर गाळ्याभवती पुठ्ठयांची साठवणूक करण्याला मनाई केल्यानंतरही जागोजागी त्यांचा साठा केलेला आहे. त्यासाठी प्लास्टिकचे शेड उभारण्यात आले आहेत. हेच प्लास्टिक पेटल्याने काही क्षणात आग इतरत्र पसरली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआग