शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

महापौरपदासाठी आज अर्ज दाखल होणार; सर्वपक्षीय नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 6:43 AM

महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. शुक्रवार, ३ तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार असून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीमध्ये दगाफटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने समर्थकांसह सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.

नवी मुंबई : महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. शुक्रवार, ३ तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार असून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीमध्ये दगाफटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने समर्थकांसह सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे.नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची सत्ता कायम राहणार की, शिवसेना भगवा फडकविणार, याविषयी उत्सुकता शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत उमदेवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिवसेनेच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय चौगुले उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीने उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. डॉ. जयाजी नाथ, जे. डी. सुतार, विनोद म्हात्रे यांची नावे आघाडीवर आहेत; परंतु गणेश नाईक चर्चेतील नावांना बगल देऊन आयत्या वेळी नवीन चेहरा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिलेला उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामध्ये सलुजा सुतार यांचे नाव आघाडीवर आहे.महापौरपदासाठी शिवसेना व राष्ट्रवादीने दावा केला असून, उपमहापौरपदासाठी काँगे्रसच्या वतीने अर्ज दाखल केला जाणार आहे. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांचे नाव निश्चीत समजले जात आहे; परंतु शिवसेनेच्या वतीने काँगे्रसला महापौरपद देण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे नक्की काय होणार? हे शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांची मते फोडण्याची रणनीती आखली आहे. दगाफटका बसू नये, यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीने त्यांचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना केले आहेत.आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटीमहापालिकेची सत्ता टिकविण्यासाठी माजी पालकमंत्री गणेश नाईक स्वत: लक्ष देत आहेत.राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार नाही यासाठी दक्षता घेतली जात आहे. काँगे्रसबरोबर आघाडी टिकविण्यासाठीही व अपक्षांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडून काँगे्रस व अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटी लागली असून नक्की बाजी कोण मारणार, हे ९ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.भाजपाच्या भूमिकेकडे लक्षसर्वांचे लक्ष शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रससह अपक्षांच्या भूमिकेकडे लागले आहे. भाजपाच्या सहा नगरसेवकांना महत्त्व दिले जात असून, त्यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शुक्रवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लढतीचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई