शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

नेरळ येथील शेतकऱ्याचे कुटुंबासह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 02:01 IST

जमिनीवर कब्जा केल्याचा दावा : बनावट कागदपत्रे तयार के ल्याचा आरोप

कर्जत : तालुक्यातील खाडेपाडा आणि मानिवली येथे असलेल्या शेतीचा बेकायदेशीर कब्जा घेतल्याचा दावा करून कायदेशीर लढाई लढत असलेल्या शेतकरी कुटुंबाने आता आपल्या हक्कासाठी उपोषण सुरू केले आहे. आपल्या शेतामध्ये शेतकरी कुटुंबाने ४ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले असून, नेरळ पोलिसांकडून उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यात आली.

नेरळ येथे राहणारे गोविंद मालू डायरे यांच्या कुटुंबाला वारसाहक्कातून मानिवली आणि खाडेपाडा येथे जमीन आली. खाडेपाडा येथे असलेल्या जमिनी आहेत. या जमिनीपैकी खाडेपाडा येथील काही जमीन परस्पर विकली गेली असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. बनावट दस्तावेज बनवून ही जमीन हडप करण्यात आली, असा आरोप गोविंद मालू डायरे आणि कुटुंबाचा आहे. याबाबत त्यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि सर्व शासकीय विभाग यांच्याकडे अर्ज करून दाद मागितली होती. त्यानंतर भूमी अभिलेखचे उपसंचालक यांच्या आदेशाने जागेवर जाऊन मोजणी केली होती. त्या मोजणी नंतर शासनाने कारवाई करून आपली जागा परत मिळावी, यासाठी अनेक मार्गाने न्याय मागण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खाडेपाडा येथे असलेल्या आपल्या जमिनीवर आपल्या जागेत गोविंद मालू डायरे तसेच त्यांचे कुटुंबीय यांनी उपोषण सुरू केले. गोविंद मालू डायरे यांच्यासह चंद्रकांत मालू डायरे, वामन खंडू डायरे, चंद्रभागा मंगल डायरे आणि सविता डायरे यांनी हे उपोषण सुरू केले आहे.आपल्या कुटुंबावर अन्याय करणाºया भूमिलेख विभागाचे अधिकारी, भूमापक, जमिनीची विक्री करणाºया व्यक्तीवर आणि त्यांना मदत करणाºया व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करीत आमरण उपोषणाची नोटीस गोविंद डायरे यांनी दिली होती. यापूर्वीही डायरे यांनी उपोषण केले होते. मंगळवारी सायंकाळी उपोषणकर्ते यांची नेरळ पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कारभार असलेले सहायक पोलीस निरीक्षक पी. टी. काळे यांनी भेट घेऊन माहिती घेतली. त्यानंतर कर्जत येथील भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी वाय. एस. शेळके यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत मोजणी नकाशानुसार पॉइंट टाकून देण्याची तयारी दाखवली; पण आकारफोड होत नाही तोवर आपण उपोषण सोडणार नाही आणि दोषी कर्मचाºयांवर कारवाई होत नाही तोवर आपले आंदोलन सुरू राहील, असा निर्धार व्यक्त केला. 

टॅग्स :FarmerशेतकरीKarjatकर्जत