शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मराठवाड्याचे शेतकरी म्हणतात, माघार नाहीच; खिशातील पैसे खर्च करून आंदोलनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 08:07 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारपासूनच आंदोलक येण्यास सुरुवात झाली होती.

नवी मुंबई : हटायचे नाही, झुकायचे नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निर्धार जालना, परभणी, नांदेडसह मराठवाड्यातून आलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक गावातून घराघरातून नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. खिशातील पैसे खर्च करून वाहनांचा बंदोबस्त केला आहे. जेवणापासून राहण्यापर्यंत सर्व तयारी करूनच लढ्यात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारपासूनच आंदोलक येण्यास सुरुवात झाली होती. अनेक जण १७ जानेवारीपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणची तयारी, वैद्यकीय तपासणी व इतर आवश्यक कामे करण्यासाठी अनेक जण पुढे आले होते. या सर्वांची मसाला मार्केटमध्ये सोय केली होती. माथाडी कामगार, व्यापारी व सकल मराठा समाजाने या सर्वांच्या अंघोळ, पाणी व जेवणाची सोय केली होती. मराठा आंदोलनाच्या लढ्यामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या. मराठा क्रांती मोर्चा व त्या अगोदरपासूनही चळवळीमध्ये सक्रिय आहे. आता निर्णायक लढा सुरू आहे. अंतरवाली सराटी ते नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासामध्ये दिवसेंदिवस आंदोलनाला प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या.  

प्रत्येक गावातील मराठा समाजातील तरुण आंदोलनात सहभागी झाले आहेत. आम्ही स्वखर्चाने गाडी करून आलो असून, आरक्षण मिळेपर्यंत लढ्यात सहभाग कायम असेल. - गणेश पाचकोट, परभणी

शेतात काही पिकत नाही. मुलांना शिकविण्यासाठी पैसे नाहीत. शिकलेल्या मुलांना नोकरी नाही. यामुळे आरक्षण मिळेपर्यंत आता माघार घ्यायची नाही. - माधव कदम, बोर्डा, गंगाखेड, परभणी

मराठा आरक्षणासाठीच्या आतापर्यंतच्या सर्व लढ्यात सहभागी होत आलो आहे. लढा आता निर्णायक टप्प्यात आला असून, आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही.     - सोपान क्षीरसागर, जालना

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील