शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आठवडे बाजाराला उन्हाच्या झळा; ग्राहकांची कमी, शेतकऱ्यांना फटका

By योगेश पिंगळे | Updated: May 4, 2024 14:39 IST

मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून, नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असून नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत.

नवी मुंबई : शेतकरी आठवडे बाजारामुळे नवी मुंबईतील ग्राहकांना शेतमाल थेट मिळू लागला आहे. मात्र, कडक उन्हाचा फटका या बाजाराला बसला असून, शहरातील बेलापूर, नेरूळ, वाशी आदी ठिकाणी सुरू असलेला शेतकरी आठवडे बाजार मंदीत सुरू असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

दलालांची साखळी तोडून काढण्याच्या उद्देशाने शासनाने थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचता करण्याची शेतकऱ्यांना आणि पर्यायाने ग्राहकांना दिलासा देणारी योजना अमलात आणली आहे. या आठवडे बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी किमतीत व ताजा भाजीपाला, फळे मिळत असल्याने या बाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहाटे सुरू होणारा हा बाजार दुपारपर्यंत संपतो.

मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून, नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असून नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील संपल्या आहेत. यामुळे अनेक नागरिक गावी गेले आहेत. ग्राहकांचे प्रमाण घटल्याने आठवडे बाजारात दुकाने थाटून बसलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर आले असून, प्रवास खर्चदेखील सुटत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्याच मालाची ने-आण करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेकवेळा शेतमाल फेकून द्यावा लागतो. दरवर्षी उन्हाळ्यात अशाच समस्या उद्भवत असल्याने उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी