शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकरी आठवडे बाजाराला उन्हाच्या झळा; ग्राहकांची कमी, शेतकऱ्यांना फटका

By योगेश पिंगळे | Updated: May 4, 2024 14:39 IST

मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून, नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असून नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत.

नवी मुंबई : शेतकरी आठवडे बाजारामुळे नवी मुंबईतील ग्राहकांना शेतमाल थेट मिळू लागला आहे. मात्र, कडक उन्हाचा फटका या बाजाराला बसला असून, शहरातील बेलापूर, नेरूळ, वाशी आदी ठिकाणी सुरू असलेला शेतकरी आठवडे बाजार मंदीत सुरू असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

दलालांची साखळी तोडून काढण्याच्या उद्देशाने शासनाने थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचता करण्याची शेतकऱ्यांना आणि पर्यायाने ग्राहकांना दिलासा देणारी योजना अमलात आणली आहे. या आठवडे बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी किमतीत व ताजा भाजीपाला, फळे मिळत असल्याने या बाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहाटे सुरू होणारा हा बाजार दुपारपर्यंत संपतो.

मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून, नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असून नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील संपल्या आहेत. यामुळे अनेक नागरिक गावी गेले आहेत. ग्राहकांचे प्रमाण घटल्याने आठवडे बाजारात दुकाने थाटून बसलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर आले असून, प्रवास खर्चदेखील सुटत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्याच मालाची ने-आण करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेकवेळा शेतमाल फेकून द्यावा लागतो. दरवर्षी उन्हाळ्यात अशाच समस्या उद्भवत असल्याने उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी