शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकरी आठवडे बाजाराला उन्हाच्या झळा; ग्राहकांची कमी, शेतकऱ्यांना फटका

By योगेश पिंगळे | Updated: May 4, 2024 14:39 IST

मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून, नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असून नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत.

नवी मुंबई : शेतकरी आठवडे बाजारामुळे नवी मुंबईतील ग्राहकांना शेतमाल थेट मिळू लागला आहे. मात्र, कडक उन्हाचा फटका या बाजाराला बसला असून, शहरातील बेलापूर, नेरूळ, वाशी आदी ठिकाणी सुरू असलेला शेतकरी आठवडे बाजार मंदीत सुरू असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

दलालांची साखळी तोडून काढण्याच्या उद्देशाने शासनाने थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचता करण्याची शेतकऱ्यांना आणि पर्यायाने ग्राहकांना दिलासा देणारी योजना अमलात आणली आहे. या आठवडे बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी किमतीत व ताजा भाजीपाला, फळे मिळत असल्याने या बाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहाटे सुरू होणारा हा बाजार दुपारपर्यंत संपतो.

मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून, नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असून नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील संपल्या आहेत. यामुळे अनेक नागरिक गावी गेले आहेत. ग्राहकांचे प्रमाण घटल्याने आठवडे बाजारात दुकाने थाटून बसलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर आले असून, प्रवास खर्चदेखील सुटत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्याच मालाची ने-आण करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेकवेळा शेतमाल फेकून द्यावा लागतो. दरवर्षी उन्हाळ्यात अशाच समस्या उद्भवत असल्याने उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी