शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

आता नवी मुंबईत कौटुंबिक न्यायालय; २० पदांना मान्यता

By नारायण जाधव | Updated: November 22, 2022 18:57 IST

संबंधितांचा ठाण्याला जाण्याचा त्रास वाचणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्याच्या विधि व न्याय विभागाने खास नवी मुंबई शहरासाठी कौटुंबिक न्यायालय आणि त्यासाठी लागणाऱ्या न्यायाधीश ते शिपायापर्यंतच्या पदांना मंगळवारी मान्यता दिली. यामुळे कौटुंबिक हिंसाचार आणि वाद-तंट्याच्या प्रकरणांत ऊठसूट ठाण्याला धाव घेण्याचा शहरवासीयांचा त्रास वाचणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शहरातील या प्रकरणातील अशील आणि वकिलांनाही दिलासा मिळाला आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे नवी मुंबई शहराची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजघडीला ती साडेसाेळा लाखांहून अधिक झाली आहे. लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढत आहे, त्याप्रमाणे येथील कौटुंबिक हिंसाचार आणि वाद-तंटेही वाढले आहेत. यामुळे खास नवी मुंबईसाठी कौटुंबिक न्यायालयाची मागणी होत होती. अखेर विधि व न्याय विभागाच्या सूचनेनुसार उच्चस्तरीय समिती आणि मंत्रिमंडळाने या न्यायालयास मान्यता दिली आहे.

यानुसार या कौटुंबिक न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या एक न्यायाधीश, एक प्रबंधक, एक अधीक्षक, विवाह समुपदेशक आणि वरिष्ठ लिपिक, लिपिकांसह बहुउद्देशीय कर्मचारी अशा २० पदांच्या निर्मितीसही मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरात लवकरच कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असल्याने कौटुंबिक हिंसाचार आणि वाद-तंट्याच्या प्रकरणांत ऊठसूट ठाण्याला धाव घेण्याचा नवी मुंबईकरांचा त्रास वाचणार असल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

जिल्हा न्यायालयाच्या ४४ पदांनाही यापूर्वी दिली हाेती मान्यता- नवी मुंबईसारख्या वाढत्या नागरीकरण होत असलेल्या शहरांतील कनिष्ठ न्यायालयातील खटल्यांची संख्या तसेच फौजदारी आणि गुन्हेगारी खटल्यांचे प्रमाण पाहता उच्च न्यायालयाच्या न्यायालय स्थापना समितीने नवी मुंबईत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय स्थापन्यास मान्यता दिल्यानंतर न्यायाधीशांसह अधिकारी व कर्मचारी अशा ४४ पदांना गेल्याच आठवड्यात मंजुरी दिली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFamilyपरिवारCourtन्यायालयthaneठाणे