शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कॉलसेंटरवर छापा, आठ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:22 IST

कर्ज अथवा विमा काढून देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉलसेंटरवर गेल्या आठवड्यात कारवाई केली.

नवी मुंबई : कर्ज अथवा विमा काढून देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉलसेंटरवर गेल्या आठवड्यात कारवाई केली. सीबीडीच्या पोलीस आयुक्तालयात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी ही माहिती दिली.कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची तक्रार सायबर सेलकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त अजय कदम, सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करण्यात आली होती. तक्रारदारांना आलेले फोन ड्रिम मॉलमधील एका सर्व्हिस सेंटरमधून आल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार गत आठवड्यात पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला होता. या वेळी तिथे चालणारे बनावट कॉलसेंटर उघड झाले. ड्रिम मॉलमधील भाड्याच्या गाळ्यामध्ये अल्ट्रा मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या नावाखाली कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्या ठिकाणावरून गरजवंतांना फोन करून कर्ज अथवा विमा काढून देण्याचे आश्वासन दिले जायचे. याकरिता बजाज अलायन्स, रिलायन्स सर्व्हिसेस व इतर कंपन्यांच्या नावाचा वापर केला जायचा. याकरिता सदर कंपन्यांच्या नावाशी साम्य असलेली बनावट बँक खातीही उघडण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या खोट्या आश्वासनाला कोणी बळी पडल्यास त्यांना कर्ज अथवा विमा काढून देण्यासाठी लागणारे शुल्क दिल्ली, नोयडा अथवा गाझियाबाद येथील बँक खात्यात भरण्यास सांगितले जायचे.अटक केलेल्यांची रोहित पार्टे (२९), प्रशांत कोटीयन (२८), नीलेश पडवळे (३१), प्रवीण निंबाळकर (२८), राहुल वैराळ (२६), विक्रांत गजमल (२९), परेश दीपकर (३४) व सुमित सावंत (२४) अशी नावे आहेत. त्यांच्या कार्यालयातून तीन लॅपटॉप, २० मोबाइल फोन व एक संगणक व तीस हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.>झटपट श्रीमंतीसाठी भांडुपला उघडले सेंटरअटक केलेले आठही जण यापूर्वी विक्रोळी येथील एका कंपनीत एकत्र कामाला होते. तेथील ग्राहकांची माहिती त्यांच्याकडे होती. या आधारे तसेच झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी एकत्रित येऊन भांडुपला बनावट कॉलसेंटर सुरू केले होते. त्यांनी राज्यभरात अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता असून, त्यापैकी दोन घटना खारघर व उरणमधील आहेत. त्यांची एकूण साडेपाच लाखांची फसवणूक झालेली आहे.