शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पनवेलमध्ये पाणीटंचाईवर बोअरवेलचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 02:36 IST

पनवेल शहर व ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाईमुळे बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. तालुक्यात ३०० ते ४०० फुटांपर्यंत चाचपणीचा प्रयत्न केला जात आहे.

- मयूर तांबडे पनवेल : पनवेल शहर व ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाईमुळे बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. तालुक्यात ३०० ते ४०० फुटांपर्यंत चाचपणीचा प्रयत्न केला जात आहे. काही वर्षांपूर्वी अवघ्या ५० ते १०० फुटांवर लागणारे पाणी आता ३०० ते ४०० फुटांवरदेखील लागत नसल्याने भविष्यातील पाण्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर झाली असून, विहिरी किंवा बोअरवेलमधील पाणीपातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आव्हान समोर आहे.तीव्र उन्हाळ्यामुळे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रासह ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे बोअरवेलच्या मागणीमध्ये सुमारे २५ ते ३० टक्के वाढ झाली असून, बांधकाम व्यावसायिकांबरोबरच सोसायट्यांकडूनही मोठ्या प्रमाणात बोअरवेल खणण्यात येत आहेत. बोअरवेल घेण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. मात्र, त्या प्रमाणात पाण्याचे पुनर्भरण होत नाही. परिणामी, भूजल पातळी कमी होत चालली आहे. पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात बोअरवेल मारत आहेत. तालुक्यात भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. जमिनीतून पाणी मिळेल या आशेने नागरिक बोअरवेल खोदत आहेत; मात्र पाणी मिळण्याऐवजी ३०० ते ४०० फूट खोल बोअरवेलसाठी २० हजार ते ३० हजार रु पये खर्च होत आहेत. पूर्वी ५० ते १०० फुटांवर असणारी पाणीपातळी आता प्रचंड खालावल्यामुळे विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये बोअरवेलचा व्यवसाय तेजीत आहे. भूगर्भ विभागाच्या सूचनेनुसार २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरसाठी परवानगी घ्यावी लागते; पण या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष करून खोलवर बोअर घेतले जात आहेत. पाणीपातळी खालावत चालली असल्याने जुन्या-नव्या बोअरवेल पुनर्भरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. शास्त्रीय पद्धतीने पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडणारी यंत्रणा उभी करावी लागेल.नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पाण्याची ही गरज भागवण्यासाठी विहीर व बोअरवेल खोदण्यासाठी लाखो रुपये खर्ची घातले जात आहेत. या परिसरात खोदकामासाठी जणू काही चढाओढच चालली आहे.>पाणाड्यांना मागणी वाढलीबोअरवेलची जागा निश्चित करण्यासाठी परिसरातील जमिनीतील पाणी शोधणारे पाणाडे येऊन पाण्याचे ठिकाण, जागा सांगत आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार नागरिक हजारो रुपये खर्चून बोअरवेल खोदत आहेत. पाणी असलेली जागा दाखविण्याची फी सुमारे दोन ते तीन हजार रुपये घेतली जात आहे. पाणाडे नारळ, लाकडी काठ्या, तवा फिरवून व विविध प्रकारच्या झाडांचा अंदाज घेत, पाणी सांगत आहेत; मात्र भूगर्भात पाणी नसल्याने नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे.