शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिंद्रे खटल्याच्या निकालासाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 02:13 IST

कामकाजासाठी एक वर्ष; आनंद बिंद्रे यांची साक्ष पूर्ण; आरोपींच्या अडचणी वाढल्या

पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील आरोपी राजेश पाटीलने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला जाण्याच्या भीतीने अचानक काढून घेतला आहे. त्यामुळे या हत्येच्या खटल्यातील आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या खटल्याचे कामकाज पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाने पनवेल सत्र न्यायालयाला दिली आहे.

अश्विनी बिंद्रे हत्याकांडामध्ये बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हे आरोपी आहेत. या खटल्यातील साक्षीदारांची ओळख परेड आणि उलट तपासणी पनवेल सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी सुरू केली होती. मुख्य साक्षीदार अश्विनी यांचे भाऊ आनंद बिंद्रे यांची साक्ष पूर्ण झाली असून, पती राजू गोरे यांची उलट तपासणी सुरू आहे. या खटल्याचे कामकाज आॅक्टोबरपर्यंत संपविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोरोनामुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजीखटल्यातील प्रमुख आरोपी राजेश पाटीलने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, ही माहिती सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांना देण्यात आली नाही. २७ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता याबाबत त्यांना कळविण्यात आले. यावरून पोलीस यंत्रणा आजही अभय कुरूंदकर आणि अन्य आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी करून पोलिसांच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र