शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

द्रुतगती मार्ग धोकादायक, अनेक ठिकाणी खचली लेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:13 IST

सुरक्षित आणि जलद प्रवास या हेतून बांधण्यात आलेला मार्ग अपघात, लूटमार आणि वीकएण्डला वाहतूककोंडीमुळे जास्त चर्चेत आहे.

-  अंकुश मोरेवावोशी : ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची झाली आहे. आडोशी हद्दीत काही ठिकाणी लेन खचली असून, मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. भारतातील पहिला सहापदरी द्रुतगती मार्ग म्हणून मुंबई पुणे मार्ग ओळखला जात होता. सुरक्षित आणि जलद प्रवास या हेतून बांधण्यात आलेला मार्ग अपघात, लूटमार आणि वीकएण्डला वाहतूककोंडीमुळे जास्त चर्चेत आहे.मुंबईहून पुण्याकडे जाताना आडोशी हद्दीत दुसऱ्या आणि तिसऱ्या मार्गिकेत(लेन) रस्ता काही ठिकाणी खचला आहे. काँक्रिटचा खचलेला रस्ता वरखाली झाला असून, डांबर टाकून केलेली मलमपट्टी फारशी लागू पडलेली नाही. खचलेला भाग दबल्यामुळे काही ठिकाणी काँक्रिटवर आले आहे. वर आलेला रस्त्याचा भाग अतिशय धोकादायक स्थितीत आहे. पहिली मार्गिका अवजड वाहनासाठी तर दुसरी मार्गिका हलक्या वाहनासाठी असून, वेगात जाणाऱ्या वाहनाच्या टायरला फटका बसल्यास जीवघेण्या अपघातची शक्यता आहे. काँक्रिटवर डांबरचा थर देऊनही रस्ता खड्डे नजरेत भरत आहेत. वाहनचालकांकडून सक्तीने टोलवसुली करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मात्र हयगय होत आहे.वीस वर्षांनंतर द्रुतगती मार्गाचा दुरुस्तीचा ठेका पुन्हा आयआरबीला मिळाला आहे, परंतु आयआरबीकडून धोकादायक मार्गिका दुरुस्तीसाठी पाठपुरावा होणे आवश्यक असताना, गांभीर्याने दखल घेतली जात नाही.वीस वर्षांत सुरक्षेच्या दृष्टीने ठोस कामे द्रुतगती मार्गावर झाली नाहीत. टोलवाढ मात्र नियमित केली जाते. द्रुतगती मार्गावरून दररोज आयआरबी अभियंते ये-जा करतात त्यांची याबाबत उदासीनता अपघाताला आमंत्रण देत आहे. खचलेली मार्गिका पाहून वाहनचालक अचानक वेग कमी करतो आणि त्यामुळे पाठीमागून वेगात आलेले वाहन एकमेकांवर आपटून अपघाताच्या घटना घडतात.- प्रशांत पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ताही दुरुस्ती सध्या जयहिंद कंत्राटदाराकडे आहे. वर्षभरापासून दुरुस्ती रखडलेली आहे. अधिक माहिती वरिष्ठ देतील.- भोईटे, आयआरबी अभियंता