शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

पंतप्रधानांप्रमाणे स्वतःच्या राज्याबद्दलचे प्रेम व्यक्त करा : राज ठाकरे

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 28, 2024 23:00 IST

हिंदी राष्ट्रभाषा नसून केवळ केंद्र आणि राज्याच्या समन्वयाची भाषा

नवी मुंबई : देशाच्या पंतप्रधांना स्वतःच्या राज्याबद्दल भाषेबद्दल असलेले प्रेम लपवता येत नाही, मग तुम्ही का लपवताय असा टोला मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठीलाच टिकवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली. महाराष्ट्र मंडळाकडून अमेरिकेत शंभरहून अधिक मराठी शाळा चालवल्या जात असल्या तरीही, सर्वप्रथम राज्यात लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र शासनातर्फे वाशीत आयोजित विश्व मराठी संमेलनासाठी ते रविवारी उपस्थित होते.

शासनातर्फे वाशी येथे तीन दिवसीय विश्व मराठी संमेलन भरवण्यात आले आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी राज्यात मराठी शाळा बंद होत असताना महाराष्ट्र मंडळ अमेरिकेत सुमारे १०० मराठी शाळा चालवत असल्याचे गौरव उदगार राज ठाकरे यांनी काढले. मात्र अगोदर महाराष्ट्रात लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधांना स्वतःच्या राज्याबद्दल, स्वतःच्या भाषेबद्दलचे प्रेम लपवता येत नाही. तर तुम्ही आम्ही ते का लपवतोय असाही प्रश्न त्यांनी उपस्थितांना व्यक्त केला. मराठी भाषा हि उत्तम असतानाही ती संपवण्याचा राजकीय प्रयत्न होत असल्याचे बघून तळपायाची आग मस्तकात जात असल्याचे बोलत यांनी आपला रोष व्यक्त केला.

तर हिंदी हि आपली राष्ट्रभाषा नसून इतर भाषांप्रमाणेच एक भाषा असून केवळ केंद्र आणि राज्ये यांच्यात समन्वयाची वापरली जाते. तर कोणत्याच भाषेची राष्ट्रभाषा म्हणून निवड झालेली नाही. परंतु आपण मात्र गोट्यासारखे दुसऱ्या भाषेकडे घरंगळत जात असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या वर्षांपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा केला असल्याचे सांगितले. तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षण देखील मराठीत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर - म्हैसकर ह्या देखील उपस्थित होत्या. 

पाहुण्याच्या घरी असल्याने उद्धार करणे टाळतोय

मराठी भाषेच्या प्रसाराबद्द्दल शासनाची असलेल्या उदासीनतेबद्दल खंत व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाने मराठी भाषेवर उपकार करावेत असा टोला मारला. परंतु शासकीय कार्यक्रम असल्याने आवरते घेत व पाहुण्यांच्या घरी जाऊन त्यांचाच उद्धार करणे बरे नसल्याचे म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे