शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

नागरी कामांवरील खर्च जाणार पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 02:10 IST

प्रशासनाची डोळेझाक : अर्धवट स्थितीतील कामांमुळे उडणार बोजवारा

नवी मुंबई : मागील काही महिन्यांत प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेली बहुतांश कामे अर्धवट स्थितीत सोडण्यात आलेली आहेत. त्यात रेलिंग बसवण्याच्या कामांसह पदपथांच्या कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही कामे अर्धवट स्थितीतच सोडून देण्यात आलेली असल्याने, त्यावर झालेला खर्च यंदाच्या पावसाळ्यात पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिकेच्या वतीने मागील काही महिन्यांत प्रत्येक नोडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये पदपथ दुरुस्तीसह रस्त्यालगत रेलिंग बसवण्याच्या कामांचा सर्वाधिक समावेश आहे. या कामांवर प्रभागनिहाय लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. मात्र, त्यापैकी बहुतांश कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केवळ ठेकेदारांच्या घशात निधी घालण्यासाठी कामे काढली का? अशीही शंका निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रेलिंग बसवल्यानंतर त्याखालील जागेत सिमेंटचा भरणा करून पाया भक्कम करण्यात आलेला नाही. त्याऐवजी मातीचा भराव टाकून थुकपट्टी लावण्याची कामे झाली आहेत. यामुळे बहुतांश ठिकाणचे रेलिंग एका बाजूला झुकले असून ते दोन ते तीन महिन्यांतच कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यापैकी काही ठिकाणी महावितरणने खोदकाम करून तिथल्या समस्येत अधिकच भर टाकली आहे. घणसोली सेक्टर १५ येथे गॅसच्या पाइपसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाच्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक असतानाही ते करण्यात आलेले नाही. केवळ खडी व मातीचा भराव टाकून बुजवण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर खोलगट भाग तयार झाला असून पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी साचल्यास खडी वाहून जाऊ शकते; परंतु या संदर्भात संबंधितांकडे तक्रार करूनही खोदकामाच्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यास टाळाटाळ होताना दिसत आहे. मात्र, अशा प्रकारच्या अर्धवट स्थितीत सोडण्यात आलेल्या कामांमुळे त्यावर खर्च करण्यात आलेला लाखोंचा निधी पावसाच्या पाण्यात जाण्याची परिस्थिती आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई