शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

वाशी निवारा केंद्रातून आश्रित परप्रांतीयांना हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 06:45 IST

परराज्यातील व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचे काम नवी मुंबई पोलिसांकडून गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे.

नवी मुंबई : रेल्वेत जागा न मिळाल्याने मुक्काम वाढल्याने तात्पुरता आश्रय दिलेल्या परराज्यातील व्यक्तींची जमावाने हकालपट्टी केल्याचा प्रकार सोमवारी रात्री वाशी गावात घडला. यामुळे काही वेळासाठी त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी स्थलांतरितांची इतरत्र सोय करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.परराज्यातील व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचे काम नवी मुंबई पोलिसांकडून गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र रेल्वेची सोय करून दोन्ही परिमंडळांमधील संबंधित राज्यांतील व्यक्तींना पाठवले जात आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना रेल्वेने पाठवले जाणार होते. याकरिता त्याच दिवशी संबंधित व्यक्तींना गावी जाण्याच्या तयारीतच प्रत्येक पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र रेल्वेतील प्रवासी क्षमता संपल्याने वाशी पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे शंभरहून अधिकांचा प्रवास रद्द करण्यात आला. तर त्यांना पुढच्या रेल्वेचे नियोजन होईपर्यंत पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले. मात्र सर्वजण भाडोत्री जागेत राहणारे असल्याने व गावी जाण्यासाठी घराचा ताबा सोडून आले होते. त्यापैकी बहुतांश कुटुंबे वाशी गावातील होती.काहींना पुन्हा वाढीव दिवसासाठी संबंधित घरमालकांनी घराचा ताबा दिला. परंतु आठ ते दहा कुटुंबांना घरमालकांनी तात्पुरता आसरा देण्यास नकार दिला. यामुळे पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या मैदानात त्यांनी ठाण मांडले होते. त्यात महिला व पुरुषांसह वृद्ध व्यक्ती व लहान मुलांचाही समावेश होता. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत व वाशी पोलीस यांनी वाशी गावातीलच पालिका शाळेत त्यांच्या निवाऱ्याची तसेच अन्नपाण्याची सोय केली.मात्र सोमवारी रात्री वाशी गावातीलच काही व्यक्तींनी असहाय व बेघर असलेल्या कुटुंबीयांबद्दल परिसरात अफवा पसरवली. त्या व्यक्ती वाशी गावातीलच भाडोत्री राहिलेल्या असतानाही मुंबईवरून त्यांना आणल्याची तसेच त्यांना कोरोना झाल्याची अफवा पसरवली. त्यामुळे शाळेबाहेर दीडशे ते दोनशे जणांचा जमाव जमला. त्याची माहिती मिळताच वाशी पोलीस व दशरथ भगत यांनीही त्या ठिकाणी जाऊन आश्रय देण्यात आलेल्या व्यक्ती वाशी गावातल्याच असल्याचे सांगितले. परंतु जमावाने त्यांना शाळेतून हाकलण्याचा प्रयत्न केला. अखेर वाशी पोलिसांनी त्या सर्व परराज्यातील व्यक्तींना जमावाच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढले.मुंबईत येणारे लोंढे जाताहेत स्वगृहीमुंबई ही प्रत्येकाच्या हाताला काम देणारी नगरी आहे. मुंबईत आल्यावर काम मिळणारच अशी येथे येणाºया प्रत्येकाला खात्री असते. याच आशेवर मुंबईत परप्रांतीय मोठ्या संख्येने दाखल होतात. हाताला मिळेत ते काम हे लोक करतात.मात्र आज कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आणि लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने या परप्रांतीय कामगारांनी आपल्या राज्यात घरी जाण्यास सुरुवात के ली. ज्या प्रकारे हे लोंढे मुंबईत येत होते, तसेच आता स्वगृही परतत आहेत.अमानुष वर्तणूकवाशी गावातील प्रकारामुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. कोरोनाच्या आडून काही व्यक्ती परराज्यातील व्यक्तींप्रति अमानुष वर्तणूक करीत असल्याचेही दिसून येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई