शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

नापास विद्यार्थ्यांची सोमवारी परीक्षा

By admin | Updated: July 16, 2016 01:50 IST

महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू असतानाच १० वी व १२ वीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा कोकण विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जात आहे.

ठाणे : महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू असतानाच १० वी व १२ वीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा कोकण विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जात आहे. यानुसार १२ वीतील आठ हजार ५१८ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत सुरू असून १० वीच्या ११ हजार १७१ विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवार, १८ जुलैपासून घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रास परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची ही पुनर्परीक्षा २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या साडेआठ हजार विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था १२ परीक्षा केंद्रांवर केली आहे. याशिवाय ३ आॅगस्टदरम्यान पार पडणाऱ्या १० वीच्या पुनर्परीक्षेला जिल्ह्यातील ११ हजार १७१ विद्यार्थी आहेत. त्यांची जिल्ह्यातील २८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. परीक्षा केंद्रांत व आजूबाजूच्या परिसरांत शांतता व सुव्यवस्था राखण्यासह अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. परीक्षा काळामध्ये परिरक्षण केंद्र,परीक्षा केंद्र, उपकेंद्र व परिसरात काही असामाजिक तत्त्वे परीक्षा प्रक्रि येत गैरव्यवहार व बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, कम्युनिकेशन सेंटर या ठिकाणांहून गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. याशिवाय बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अगर शांतताभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील या अनुचित घटनांना वेळीच प्रतिबंध घालणे जरु रीचे आहे.