शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

माजी सैनिकांची होतेय परवड

By admin | Updated: March 30, 2015 05:46 IST

देशाच्या सीमेवर जीव मुठीत घेऊन संरक्षण करणाऱ्या नौदल, भूदल आणि वायूदलातील ४५ माजी सैनिकांची मुंबई महानगरपालिकेत

मुंबई : देशाच्या सीमेवर जीव मुठीत घेऊन संरक्षण करणाऱ्या नौदल, भूदल आणि वायूदलातील ४५ माजी सैनिकांची मुंबई महानगरपालिकेत गेल्या चार वर्षांपासून ससेहोलपट सुरू आहे. मूळ वेतनाच्या प्रश्नासाठी कायदेशीर मार्गाने झगडणाऱ्या सैनिकांसाठी मनपा आयुक्तांकडे दोन वर्षांपासून वेळच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.वयाच्या पस्तीशीत भारतीय सेनेतून निवृत्त झालेल्या सैनिकांना नव्याने जीवन सुरू करण्यासाठी शासकीय आणि उपक्रमांतील नोकऱ्यांत आरक्षण दिले जाते. या आरक्षणामध्ये सैनिकाला निवृत्तीवेळी असलेल्या मूळ वेतनापासून पुढील वेतन देण्याचा नियम आहे. त्यात सहाव्या वेतन आयोगही लागू करण्यात आलेला आहे. मात्र हा नियम केवळ शासकीय नोकऱ्यांपुरता मर्यादित आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात पालिका प्रशासनाला स्वतंत्र अधिकार असल्याने राज्य शासनाच्या नियमाचे पालन करायचे की नाही, ही सूट शासनाने पालिकांना दिलेली आहे. राज्य शासनाच्या नियमाचे पालन करत पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि ठाणे या महानगरपालिकांनी माजी सैनिकांना निवृत्तीवेळी असलेले मूळ वेतन देण्याचा निर्णय घेतला. याउलट सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई मनपा दरबारी केवळ बड्या अधिकाऱ्यांच्या मर्जीमुळे माजी सैनिकांना नवख्या कर्मचाऱ्यांप्रमाणे मूळ वेतन मिळत असल्याचा आरोप भारतीय माजी सैनिक संघटनेने केला आहे.त्यांच्या देशसेवेचा मान राखत बहुतेक महानगरपालिकांत माजी सैनिकांना रुजू करून घेताना निवृत्तीवेळी असलेले मूळ वेतन देण्यात येत आहे. मात्र मुंबई मनपा १७ वर्षांच्या देश सेवेला बगल देत नवनियुक्त कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देत आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून काम करणारे माजी सैनिक राज्य शासनाच्या नियमाची अंमलबजावणीसाठी खेटे घालत आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्यास वित्त आणि सामान्य प्रशासन विभागाने यापूर्वीच शिफारस केली आहे. मात्र तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी या प्रस्तावास नकारघंटा वाजवली होती. तर आयुक्त सीताराम कुंटे यांनीही त्यात साथ दिली. याउलट उपायुक्त कार्यालयाने माजी सैनिकांसाठी इतका निधी स्थायी समितीने मंजूर करण्यास कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकही आयुक्तांनी स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवल्यास मंजूरी देण्यास तयार असल्याचा दावा संघटनेने केला आहे. परिणामी आयुक्तांच्या आडमुठेपणामुळे ४५ माजी सैनिकांना नवख्या कर्मचाऱ्याप्रमाणे मिळणाऱ्या वेतनावर काम करावे लागत आहे.