शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

माजी सैनिकांची होतेय परवड

By admin | Updated: March 30, 2015 05:46 IST

देशाच्या सीमेवर जीव मुठीत घेऊन संरक्षण करणाऱ्या नौदल, भूदल आणि वायूदलातील ४५ माजी सैनिकांची मुंबई महानगरपालिकेत

मुंबई : देशाच्या सीमेवर जीव मुठीत घेऊन संरक्षण करणाऱ्या नौदल, भूदल आणि वायूदलातील ४५ माजी सैनिकांची मुंबई महानगरपालिकेत गेल्या चार वर्षांपासून ससेहोलपट सुरू आहे. मूळ वेतनाच्या प्रश्नासाठी कायदेशीर मार्गाने झगडणाऱ्या सैनिकांसाठी मनपा आयुक्तांकडे दोन वर्षांपासून वेळच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.वयाच्या पस्तीशीत भारतीय सेनेतून निवृत्त झालेल्या सैनिकांना नव्याने जीवन सुरू करण्यासाठी शासकीय आणि उपक्रमांतील नोकऱ्यांत आरक्षण दिले जाते. या आरक्षणामध्ये सैनिकाला निवृत्तीवेळी असलेल्या मूळ वेतनापासून पुढील वेतन देण्याचा नियम आहे. त्यात सहाव्या वेतन आयोगही लागू करण्यात आलेला आहे. मात्र हा नियम केवळ शासकीय नोकऱ्यांपुरता मर्यादित आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात पालिका प्रशासनाला स्वतंत्र अधिकार असल्याने राज्य शासनाच्या नियमाचे पालन करायचे की नाही, ही सूट शासनाने पालिकांना दिलेली आहे. राज्य शासनाच्या नियमाचे पालन करत पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि ठाणे या महानगरपालिकांनी माजी सैनिकांना निवृत्तीवेळी असलेले मूळ वेतन देण्याचा निर्णय घेतला. याउलट सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई मनपा दरबारी केवळ बड्या अधिकाऱ्यांच्या मर्जीमुळे माजी सैनिकांना नवख्या कर्मचाऱ्यांप्रमाणे मूळ वेतन मिळत असल्याचा आरोप भारतीय माजी सैनिक संघटनेने केला आहे.त्यांच्या देशसेवेचा मान राखत बहुतेक महानगरपालिकांत माजी सैनिकांना रुजू करून घेताना निवृत्तीवेळी असलेले मूळ वेतन देण्यात येत आहे. मात्र मुंबई मनपा १७ वर्षांच्या देश सेवेला बगल देत नवनियुक्त कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देत आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून काम करणारे माजी सैनिक राज्य शासनाच्या नियमाची अंमलबजावणीसाठी खेटे घालत आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्यास वित्त आणि सामान्य प्रशासन विभागाने यापूर्वीच शिफारस केली आहे. मात्र तत्कालीन अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी या प्रस्तावास नकारघंटा वाजवली होती. तर आयुक्त सीताराम कुंटे यांनीही त्यात साथ दिली. याउलट उपायुक्त कार्यालयाने माजी सैनिकांसाठी इतका निधी स्थायी समितीने मंजूर करण्यास कोणतीच हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकही आयुक्तांनी स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठवल्यास मंजूरी देण्यास तयार असल्याचा दावा संघटनेने केला आहे. परिणामी आयुक्तांच्या आडमुठेपणामुळे ४५ माजी सैनिकांना नवख्या कर्मचाऱ्याप्रमाणे मिळणाऱ्या वेतनावर काम करावे लागत आहे.