शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

एलिव्हेटेडचे भूमिपूजन आॅक्टोबरमध्ये होणार

By admin | Updated: September 15, 2016 03:31 IST

मुंबई शहर आणि विस्तारित उपनगरांत दररोज असह्य गर्दीत मेटाकुटीला येऊन प्रवास करणाऱ्या सुमारे ७० लाख प्रवाशांना दिलासा देण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या चर्चगेट-विरार

मुंबई : मुंबई शहर आणि विस्तारित उपनगरांत दररोज असह्य गर्दीत मेटाकुटीला येऊन प्रवास करणाऱ्या सुमारे ७० लाख प्रवाशांना दिलासा देण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल या दरम्यानच्या दोन उन्नत रेल्वेमार्गांच्या (एलीव्हेटेड रेल्वे कॉरिडॉर) कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील महिन्यात भूमिपूजन होण्याचे संकेत वरिष्ठ सरकारी सूत्रांनी दिले. या दोन्ही प्रकल्पांवर सुमारे ३४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.अत्यंत प्रतिष्ठेची अशी बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीत होत आहे. तिचे बिगुल फुंकले जाण्याआधीच मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा या कामांचे भूमिपूजन करून त्याचे प्रचारात भांडवल करायचे असे सत्ताधाऱ्यांचे गणित असल्याचे समजते.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या आठवड्यात या दोन्ही प्रस्तावित प्रकल्पांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला होता व तुम्हाला त्यांच्या भूमिपूजनाची बातमी लवकरच मिळेल, असे सांगितले होते. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुखकर करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाची विविध विकासकामे हाती घेण्याची राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून हे दोन उन्नत रेल्वेमार्ग त्याचाच भाग आहे. त्यांच्यासाठी कमी व्याजाने दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात परदेशांतील गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखविले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री प्रभू यांनी यापूर्वीच सांगितले आहे.हे दोन्ही मार्ग रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांचे संयुक्त प्रकल्प म्हणून राबविण्याची योजना आहे. त्यांची उभारणी व संचालन यासाठी दोन्ही भागीदार मिळून एक खास कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल-एसपीव्ही) स्थापन करतील. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर पाच वर्षांत हे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आहे. रेल्वे मंत्रालय या कामांसाठी इच्छुकांकडून स्वारस्य निविदा (आरएफक्यू) खरे तर १५ आॅगस्टच्या सुमारासच मागविण्याच्या विचारात होते. पण काही कारणांमुळे ते झाले नाही. आता त्यासाठी नवे वेळापत्रक ठरविण्यात येत आहे. मुंबईतील वाहतूक समस्येवर तोडगा म्हणून अशा प्रकारे उन्नत रेल्वेमार्ग टाकण्याच्या कल्पनेवर २००७मध्ये केंद्र आणि राज्यात काँग्रेसची सरकारे असताना सर्वप्रथम चर्चा झाली होती. परंतु त्या वेळी काही प्रक्रियात्मक व तांत्रिक कारणांमुळे यावर फारशी प्रगती झाली नाही. (विशेष प्रतिनिधी)