शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

निम्मे शैक्षणीक वर्ष संपले तरी शालेय गणवेश नाही, विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा  

By योगेश पिंगळे | Updated: November 29, 2023 18:35 IST

यंदाच्या शैक्षणिक वर्षी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

नवी मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष शालेय गणवेशाविनाच सुरु झाले आहे. डीबीटी धोरणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून यंदा ई-रुपी प्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता तब्बल निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळाले नाही. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.नवी मुंबई शहरात विविध खाजगी संस्थांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा आणि शिक्षण महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारल्या आहेत. या शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आदी माध्यमाच्या आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळा देखील सुरु केल्या आहेत. यामुळे महापालिका शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढत आहे. पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशासह शैक्षणिक साहित्य देखील पुरविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०१४ -१५ मध्ये शासनाच्या माध्यमातून डीबीटी धोरण राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

शैक्षणिक वर्ष २०१६ -१७ पासून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या धोरणाच्या अंलबजावणीला सुरुवात केली आहे. परंतु या धोरणाला पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा प्रशासनाने ई -रुपी प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला होता. यावर काम देखील सुरु केले होते. त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना यंदा तरी लवकर गणवेश आणि शालेय साहित्य उपलब्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्य आणि गणवेश उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे यंदा महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

डीबीटी धोरणाला पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा ईरुपी प्रणाली राबविण्यात येत आहे. इरुपी प्रणाली राबविणारी नवी मुंबई महानगर पालिका हि पहिली असून याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळेल.राजेश नार्वेकर, आयुक्त, न.मुं.म,पा.

प्राधान्यक्रम कशाला द्यावा हे जर कळत नसेल तर प्रशासनाचेच नाही तर राज्य सरकारचे देखील अपयश आहे. महापालिकेच्या शाळेत गोर -गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात यांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रशासनाने खेळ मांडला आहे.सुधाकर सोनावणे, माजी महापौर

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका