शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे शैक्षणीक वर्ष संपले तरी शालेय गणवेश नाही, विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा  

By योगेश पिंगळे | Updated: November 29, 2023 18:35 IST

यंदाच्या शैक्षणिक वर्षी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

नवी मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष शालेय गणवेशाविनाच सुरु झाले आहे. डीबीटी धोरणाकडे पालकांनी पाठ फिरविल्याने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून यंदा ई-रुपी प्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता तब्बल निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळाले नाही. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.नवी मुंबई शहरात विविध खाजगी संस्थांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा आणि शिक्षण महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळाव्यात यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळांच्या प्रशस्त इमारती उभारल्या आहेत. या शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आदी माध्यमाच्या आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळा देखील सुरु केल्या आहेत. यामुळे महापालिका शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थ्यांची पटसंख्या देखील वाढत आहे. पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेशासह शैक्षणिक साहित्य देखील पुरविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०१४ -१५ मध्ये शासनाच्या माध्यमातून डीबीटी धोरण राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

शैक्षणिक वर्ष २०१६ -१७ पासून नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून या धोरणाच्या अंलबजावणीला सुरुवात केली आहे. परंतु या धोरणाला पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा प्रशासनाने ई -रुपी प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला होता. यावर काम देखील सुरु केले होते. त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना यंदा तरी लवकर गणवेश आणि शालेय साहित्य उपलब्ध होईल अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्य आणि गणवेश उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे यंदा महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

डीबीटी धोरणाला पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा ईरुपी प्रणाली राबविण्यात येत आहे. इरुपी प्रणाली राबविणारी नवी मुंबई महानगर पालिका हि पहिली असून याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुढील महिन्यात गणवेश आणि शैक्षणिक साहित्य मिळेल.राजेश नार्वेकर, आयुक्त, न.मुं.म,पा.

प्राधान्यक्रम कशाला द्यावा हे जर कळत नसेल तर प्रशासनाचेच नाही तर राज्य सरकारचे देखील अपयश आहे. महापालिकेच्या शाळेत गोर -गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात यांनी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रशासनाने खेळ मांडला आहे.सुधाकर सोनावणे, माजी महापौर

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका