शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष संपले तरी शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण होईना!  पनवेल तालुक्यातील २४३ शिक्षक बदली पात्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2022 17:29 IST

Navi Mumbai: राज्यातील जिल्हा परिषदांंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्राधान्यक्रम करण्यास बदली पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

- अरुणकुमार मेहत्रे 

 राज्यातील जिल्हा परिषदांंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्राधान्यक्रम करण्यास बदली पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मे २०२२ मध्ये होणा-या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया शैक्षणिक सत्र संपत आले तरी अद्याप झालेल्या नाहीत. ही बदली प्रक्रिया पूर्ण होऊन बदली आदेश निर्गमित होण्यासाठी नवीन वर्षातील फेब्रुवारी २०२३ उजडणार आहे.

मागील दोन  वर्षापासून कोरोना कारणाने शिक्षकांची आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया थंडावली होती. बदली इच्छुक शिक्षकांनी बदली प्रक्रिया सुरु करण्याबाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली  पार पडली त्यानुसार  पनवेल तालुक्यातून १२ शिक्षकांची बदली झाली आहे .  तर बाहेर जिल्ह्यातून केवळ  ७ शिक्षक पनवेल तालुक्यात आले  झाले आहेत.  पुढील टप्पा जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचा होता. आंतरजिल्हा बदली उशिराने  पार पडल्याने जिल्हांतर्गत बदल्यासाठी उशीराने सुरुवात झाली आहे. जिल्हांतर्गत बदलीसाठी पनवेल तालुक्यातील २४३ शिक्षक पात्र आहेत. त्यात सुगम म्हणजे सर्वसाधारण क्षेत्रातील २१८ शिक्षक आहेत. तर दुर्गम , अवघड क्षेत्रातील २५ पात्र  शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. या बदल्या नोव्हेंबरमध्येच होणे अपेक्षित असताना वर्ष संपत आले तरी बदली प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या बदल्या  नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात होतील असे समजते आहे.शैक्षणिक वर्ष संपत आले तरी बदली प्रक्रिया संपत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

२४३ शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली होणार एकाच क्षेत्रात दहा वर्ष आणि एकाच शाळेवर पाच वर्षे अशा शिक्षकांचा जिल्हांतर्गत बदलीसाठी पात्र होतात. त्यानुसार पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे  सर्वसाधारण क्षेत्र आणि दुर्गम व  अघड क्षेत्रातील १५४ शाळेतील २४३ शिक्षक बदली पात्र आहेत. शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द झाल्या असून नवीन वर्षात बदलीचे संकेत मिळत आहेत.

ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस खूप विलंब लावला आहे. किमान आता तरी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अंमलबजावणी व्हावी. दर वर्षी बदली प्रक्रिया व्हावी लागते. मात्र गेल्या दोन वर्षापासून शिक्षकांच्या बदली झालेल्या नाहीत. आताही जिल्हांतर्गत बदलीस विलंब होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. - सुभाष भोपी , जिल्हाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य प्राथमिक  शिक्षक संघ

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण