शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशद्वारांवर उधळपट्टी

By admin | Updated: May 23, 2016 03:23 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवेशद्वारांच्या बांधकामांवर करोडो रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. चार वर्षांनंतरही काम पूर्ण होवू शकले नाही

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवेशद्वारांच्या बांधकामांवर करोडो रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. चार वर्षांनंतरही काम पूर्ण होवू शकले नाही. यापूर्वी ३ कोटी रूपयांच्या संगणकीकरणाच्या कामामध्येही घोटाळा होवूनही ठेकेदाराला व दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले होते. त्याचपद्धतीने प्रवेशद्वाराचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित अभियंत्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. बाजार समितीमध्ये संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेली बहुतांश कामे रखडली आहेत. यामध्ये प्रवेशद्वारांच्या कामांचाही समावेश आहे. २०१२ मध्ये जवळपास ४ कोटी रूपये खर्च करून भाजीपाला, फळ मार्केटमध्ये एकूण १० व धान्य मार्केटमध्ये ४ प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू केले होते. २०१४ च्या सुरवातीलाच ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु काम करण्याची मुदत संपून दोन वर्षे झाल्यानंतरही एकही मार्केटमधील काम अद्याप पूर्ण होवू शकलेले नाही. प्रवेशद्वाराची रचना करताना त्यामध्ये सुरक्षा रक्षकांची केबिन, आवक व जावक गेटवर नोंदी ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय, पहिल्या मजल्यावरही छोटेसे कार्यालय तयार करण्याचे निश्चित केले होते. गेटवरील सर्व कामे तिथल्या तिथेच व्हावीत. पाचही मार्केटची गेट आॅनलाइन पद्धतीने जोडण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. परंतु एक वर्ष झाल्यानंतरही अनेक प्रवेशद्वारांचे प्लिंथपर्यंतचे कामही पूर्ण झाले नव्हते. चार वर्षात धीम्या गतीने काम सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये फळ व भाजीमधील बांधकाम संपले आहे. परंतु प्रवेशद्वारावरील स्वागत कमान व इतर कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अद्याप बांधकामाचा ताबा बाजार समितीकडे दिलेला नाही. प्रवेशद्वारांची रचनाही चुकली असून विनाकारण त्यावर लाखो रूपयांचा खर्च झाल्याच्या तक्रारी व्यापारी करू लागले आहेत. भाजी व फळ मार्केटमधील प्रवेशद्वारांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्यावर मागील वर्षीच पावसाळ्यात पाणी गळू लागले होते. कार्यालयामध्ये अद्याप पाण्याचे ओघळ तसेच आहेत. प्रवेशद्वाराच्या बांधकामाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. ठेकेदार काम करत असताना बाजार समितीच्या अभियंत्यांनी कधीच त्यावर लक्ष ठेवले नसल्याने काम दर्जेदारपणे झालेले नाही. अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रवेशद्वाराच्या इमारतीमध्ये काही दिवसांपासून सुरक्षा रक्षकांचे कार्यालय सुरू केले आहे. इमारतीचा वापर सुरू झाल्यामुळे शिल्लक राहिलेले काम होणारच नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. धान्य मार्केटमध्येही चार ठिकाणी प्रवेशद्वार उभारले जाणार होते. त्यामधील दोन गेटचे काम धीम्या गतीने पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. उर्वरित दोन ठिकाणची कामे सद्यस्थितीमध्ये थांबविलेली आहेत. मसाला मार्केटमध्ये रोडच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने प्रवेशद्वारांचे काम सुरूच केले नसल्याने बाजार समितीचे पैसे वाचले आहेत. या सर्व कामांची चौकशी करण्याची व दोषींवर कारवाईची मागणी होवू लागली आहे.