शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

प्रवेशद्वारांवर उधळपट्टी

By admin | Updated: May 23, 2016 03:23 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवेशद्वारांच्या बांधकामांवर करोडो रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. चार वर्षांनंतरही काम पूर्ण होवू शकले नाही

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवेशद्वारांच्या बांधकामांवर करोडो रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. चार वर्षांनंतरही काम पूर्ण होवू शकले नाही. यापूर्वी ३ कोटी रूपयांच्या संगणकीकरणाच्या कामामध्येही घोटाळा होवूनही ठेकेदाराला व दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले होते. त्याचपद्धतीने प्रवेशद्वाराचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित अभियंत्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. बाजार समितीमध्ये संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेली बहुतांश कामे रखडली आहेत. यामध्ये प्रवेशद्वारांच्या कामांचाही समावेश आहे. २०१२ मध्ये जवळपास ४ कोटी रूपये खर्च करून भाजीपाला, फळ मार्केटमध्ये एकूण १० व धान्य मार्केटमध्ये ४ प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू केले होते. २०१४ च्या सुरवातीलाच ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु काम करण्याची मुदत संपून दोन वर्षे झाल्यानंतरही एकही मार्केटमधील काम अद्याप पूर्ण होवू शकलेले नाही. प्रवेशद्वाराची रचना करताना त्यामध्ये सुरक्षा रक्षकांची केबिन, आवक व जावक गेटवर नोंदी ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय, पहिल्या मजल्यावरही छोटेसे कार्यालय तयार करण्याचे निश्चित केले होते. गेटवरील सर्व कामे तिथल्या तिथेच व्हावीत. पाचही मार्केटची गेट आॅनलाइन पद्धतीने जोडण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. परंतु एक वर्ष झाल्यानंतरही अनेक प्रवेशद्वारांचे प्लिंथपर्यंतचे कामही पूर्ण झाले नव्हते. चार वर्षात धीम्या गतीने काम सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये फळ व भाजीमधील बांधकाम संपले आहे. परंतु प्रवेशद्वारावरील स्वागत कमान व इतर कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अद्याप बांधकामाचा ताबा बाजार समितीकडे दिलेला नाही. प्रवेशद्वारांची रचनाही चुकली असून विनाकारण त्यावर लाखो रूपयांचा खर्च झाल्याच्या तक्रारी व्यापारी करू लागले आहेत. भाजी व फळ मार्केटमधील प्रवेशद्वारांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्यावर मागील वर्षीच पावसाळ्यात पाणी गळू लागले होते. कार्यालयामध्ये अद्याप पाण्याचे ओघळ तसेच आहेत. प्रवेशद्वाराच्या बांधकामाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. ठेकेदार काम करत असताना बाजार समितीच्या अभियंत्यांनी कधीच त्यावर लक्ष ठेवले नसल्याने काम दर्जेदारपणे झालेले नाही. अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रवेशद्वाराच्या इमारतीमध्ये काही दिवसांपासून सुरक्षा रक्षकांचे कार्यालय सुरू केले आहे. इमारतीचा वापर सुरू झाल्यामुळे शिल्लक राहिलेले काम होणारच नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. धान्य मार्केटमध्येही चार ठिकाणी प्रवेशद्वार उभारले जाणार होते. त्यामधील दोन गेटचे काम धीम्या गतीने पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. उर्वरित दोन ठिकाणची कामे सद्यस्थितीमध्ये थांबविलेली आहेत. मसाला मार्केटमध्ये रोडच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने प्रवेशद्वारांचे काम सुरूच केले नसल्याने बाजार समितीचे पैसे वाचले आहेत. या सर्व कामांची चौकशी करण्याची व दोषींवर कारवाईची मागणी होवू लागली आहे.