शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांचा एल्गार, सोमवारी एपीएमसी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 06:06 IST

Mathadi workers News : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी १४ डिसेंबरला एक दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. सरकार काेणाचेही असो कामगारांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी १४ डिसेंबरला एक दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारविरोधात निकराची लढाई सुरू करण्यात येणार आहे. आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी माथाडी भवनमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी, कामगारांना एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. राजकीय पक्ष न पाहता कामगारांच्या हितासाठी नेहमीच आंदोलने केली आहेत. मागील १५ वर्षांत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. माथाडी बोर्डावर व सल्लागार समितीवर सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. कामगार क्षेत्रात गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यांचा शिरकाव झाला आहे. संघटनांच्या नावाखाली खंडण्या वसूल केल्या जात आहेत. व्यवसायामध्ये परदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यापासून कामगारांचे अस्तित्वही नष्ट होत चालले आहे. कामगारांचे सर्व प्रश्न शासनाने तत्काळ सोडवावेत यासाठी निकराची लढाई सुरू केली जात आहे. १४ डिसेंबरला होणाऱ्या आंदोलनात सर्व कामगारांनी ताकदीने उतरावे, असे आवाहनही पाटील यांनी या वेळी केले.माथाडी कामगार चळवळीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अस्तित्व टिकविण्यासाठी ही लढाई आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कायद्यांमुळे बाजार समिती, तेथील व्यापारी व कामगार सर्वांचेच अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचेही आमदार शशिकांत शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील, दिलीप खोंड, पोपटराव देशमुख, गुंगा पाटील, भारती पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभर होणार आंदोलनमाथाडी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा व इतर ठिकाणचे माथाडी कामगारही सहभागी होणार आहेत. मार्केट बंद करून माथाडींच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMaharashtraमहाराष्ट्र