शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडून विजेची उधळपट्टी

By admin | Updated: October 8, 2015 23:37 IST

महापालिकेची शहरात विजेची उधळपट्टी सुरू असून त्यासाठी वर्षाला सुमारे १७ कोटी रुपयांचे बिल भरले जात आहे. भविष्यात विजेचा हा वापर नियंत्रित करण्यासाठी शहरात एलईडी

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई महापालिकेची शहरात विजेची उधळपट्टी सुरू असून त्यासाठी वर्षाला सुमारे १७ कोटी रुपयांचे बिल भरले जात आहे. भविष्यात विजेचा हा वापर नियंत्रित करण्यासाठी शहरात एलईडी बल्ब बसवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून तो लवकरच महासभेपुढे येणार आहे.महापालिकेच्या शहरात अनेक वास्तू असून त्या सर्व ठिकाणी होणाऱ्या विजेच्या वापरातून वर्षाला १७ कोटी रुपये वीज बिलाचा भरणा होत आहे. सध्या महापालिकेच्या नव्या मुख्यालयाचेच वीज बिल लाखोच्या घरात आहे. हरित इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यालयाच्या इमारतीत नैसर्गिक प्रकाश यायला जागा नसल्याने विजेच्या वापरावर आतमध्ये लखलखाट करण्यात आलेला आहे. तर पांढरा हत्ती समजल्या जाणाऱ्या मलप्रक्रिया केंद्रासाठीही मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होत आहे. सहा मलप्रक्रिया केंद्रापैकी ३ केंद्रे मोठी असून इतरही छोट्या स्वरूपातली काही प्रक्रिया केंद्रे आहेत. त्याठिकाणी होणाऱ्या विजेच्या वापरावर यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी गांभीर्य व्यक्त केले होते. त्याशिवाय पाणीपुरवठा केंद्र, सर्व विभाग कार्यालये, नागरी आरोग्य केंद्रे, रुग्णालये, सर्व शाळा, ज्येष्ठ नागरिक केंद्रे, ग्रंथालये व क्रीडा संकुल अशा महापालिकेच्या शेकडो वास्तू आहेत. प्रशासनाकडून या वास्तूचा वापर होत असल्याने त्यांचे वीज बिलही महापालिकेतर्फेच भरले जाते. त्यानुसार वीज बिल स्वरूपात वर्षाला सुमारे १७ कोटी रुपयांचा भरणा महापालिकेकडून महावितरण कंपनीला होत आहे. त्यामध्ये पथदिवे हा देखील महत्त्वाचा भाग आहे.शहरातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी लख्ख प्रकाश पडावा याकरिता शहरातील मुख्य रस्ते, प्रत्येक विभागातील रस्ते यावर पथदिव्यांची सोय पालिकेच्या विद्युत विभागाने केलेली आहे. परंतु अनेकदा रात्री बंद असणारे हे पथदिवे दिवसा सुरुच असतात. दुरुस्तीचा मोजका काही वेळ वगळता त्यामध्ये अनेकदा विद्युत विभागाचा निष्काळजीपणा दिसून येतो. अशा अनेक प्रकारातून महापालिकेची विजेची उधळपट्टी सुरुच असते. याचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीत जमा रकमेवर होत आहे. नरसेविका रुपाली भगत यांनी स्थायी समिती बैठकीत महापालिकेकडून होणाऱ्या विजेच्या वापराची माहिती मागितली होती. यावेळी विद्युत विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीमधून ही बाब उघड झाली. मात्र भविष्यात विजेच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार पालिकाही एलईडी बल्बचा वापर करणार असल्याचे विद्युत विभागाचे सह शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी सभागृहात सांगितले. शहरातील पथदिव्यांसह पालिकेच्या सर्व वास्तूंमध्ये विजेची बचत करणारे एलईडी बल्ब बसवले जाणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव बनवण्याचे काम विद्युत विभागामार्फत सुरु असून लवकरच तो महासभेपुढे सादर केला जाईल, असेही राव यांनी भगत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. (प्रतिनिधी)