शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

तुर्भेत चोरट्यांकडून वृद्धेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:07 IST

दागिन्यांसह मोबाइल पळविला : नवी मुंबईतही ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नवी मुंबई : तुर्भेमध्ये सुमन बबन हांडे या ७० वर्षांच्या महिलेचा चोरट्यांनी खून केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी घरातील तीन लाख सात हजार रुपये किमतीचे दागिने व मोबाइल पळवून नेला आहे. या घटनेमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली असून, एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मयत सुमन बबन हांडे या तुर्भे सेक्टर २२मधील जमुना निवास इमारतीमध्ये रूम नंबर २मध्ये एकट्याच राहत होत्या. मुलगा प्रवीण हांडेचा वाहतुकीचा व्यवसाय असून, तो भाइंदर येथे वास्तव्य करत असून, मुलगी कोल्हापूर येथे वास्तव्य करत आहे. सुमन या मुलांकडे येऊन-जाऊन असायच्या. १७ ते १९ मे दरम्यान त्यांचा घरामध्येच मृत्यू झाला. घरातून वास येऊ लागल्यामुळे शेजाºयांनी पोलिसांना या विषयी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता, दरवाजाला आतून कडी लावलेली होती. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आहे. तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला व नातेवाइकांना याविषयी माहिती देण्यात आली. शवविच्छेदनादरम्यान मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. नातेवाइकांनाही काहीही संशय आला नसल्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केला. हृदयविकारामुळे महिलेचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत होता.अंत्यविधी झाल्यानंतर महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे नातेवाइकांच्या निदर्शनास आले. घरामधील एक लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, एक लाख रुपये किमतीच्या दोन सोनसाखळी, ६० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या पाटल्या, ४० हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या व सात हजार रुपये किमतीचा मोबाइल गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. जवळपास तीन लाख सात हजार रुपये किमतीचा ऐवज गायब झाल्यामुळे चोरट्यांनी महिलेचा खून केल्याची तक्रार नातेवाइकांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलिसांनीही खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.तुर्भेमधील एक घरातून वास येत असल्याचे शेजाºयांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृतदेह आढळून आला. मृतदेहावर जखमांचे व्रण नव्हते. शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण स्पष्ट होईल. घरातील दागिने व मोबाइल चोरीला गेला असल्यामुळे चोरट्यांनी खून केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.- राजेंद्र गलांडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी

टॅग्स :Crimeगुन्हा