शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

आर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:52 IST

आर्थिक राजधानी मुंबईच्या निमित्ताने नवी मुंबई आता जगाच्या आर्थिक नकाशावर येत आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी भविष्यातील विकास केंद्र हे नवी मुंबईत असेल. तेथे उभ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह अन्य महत्त्वाच्या विकासकामांमुळे नवी मुंबईला अपार महत्त्व येईल, असे सीबीआरई या मानांकन देणाऱ्या संस्थेने त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे.आर्थिक राजधानी मुंबईच्या निमित्ताने नवी मुंबई आता जगाच्या आर्थिक नकाशावर येत आहे. पायाभूत सुविधांमुळे मागील दहा वर्षातनवी मुंबईचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व वाढत आहे. या सर्वेक्षणानुसार, नवी मुंबईत उभे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा त्या शहराच्या विकासाचा सर्वात मोठा भाग आहे. विमानतळाच्या निमित्ताने उभ्या होणाऱ्या ‘नवी मुंबई एअरपोर्ट प्रभाव क्षेत्र’ अर्थात ‘नैना’ या प्रकल्पामुळे पुढील काळात मुंबईच्या मुख्य भूमितील अनेक उद्योग तिकडे वळण्याची दाट शक्यता आहे. त्याच जोडीला मुंबई ते नवी मुंबई ही समुद्रावरील ट्रान्स हार्बर लिंकही उभी होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊ न पुढील काळातील महत्त्वाचे उद्योग व विकास केंद्र नवी मुंबई असेल. सीबीआरईचे भारत व नैऋत्य आशिया प्रमुख अंशुमन मॅनझिन यांच्यानुसार, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा नवी मुंबईपर्यंत विस्तार झाला आहे. या प्राधिकरणाने चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात १२,१०० कोटी रुपयांपैकी ८० टक्के रक्कम पायाभूत सुविधांसाठी ठेवली आहे. या भरमसाठ तरतुदीचा नवी मुंबईत विकासकामांना मोठा लाभ होईल. त्यातूनच पुढील दहा वर्षात गुंतवणूक व आर्थिक क्षेत्राचा हब हा नवी मुंबई असेल, असे अभ्यासात दिसले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbusinessव्यवसायMumbaiमुंबईEconomyअर्थव्यवस्था