शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

आर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:52 IST

आर्थिक राजधानी मुंबईच्या निमित्ताने नवी मुंबई आता जगाच्या आर्थिक नकाशावर येत आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई असली तरी भविष्यातील विकास केंद्र हे नवी मुंबईत असेल. तेथे उभ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह अन्य महत्त्वाच्या विकासकामांमुळे नवी मुंबईला अपार महत्त्व येईल, असे सीबीआरई या मानांकन देणाऱ्या संस्थेने त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे.आर्थिक राजधानी मुंबईच्या निमित्ताने नवी मुंबई आता जगाच्या आर्थिक नकाशावर येत आहे. पायाभूत सुविधांमुळे मागील दहा वर्षातनवी मुंबईचे आर्थिकदृष्ट्या महत्त्व वाढत आहे. या सर्वेक्षणानुसार, नवी मुंबईत उभे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा त्या शहराच्या विकासाचा सर्वात मोठा भाग आहे. विमानतळाच्या निमित्ताने उभ्या होणाऱ्या ‘नवी मुंबई एअरपोर्ट प्रभाव क्षेत्र’ अर्थात ‘नैना’ या प्रकल्पामुळे पुढील काळात मुंबईच्या मुख्य भूमितील अनेक उद्योग तिकडे वळण्याची दाट शक्यता आहे. त्याच जोडीला मुंबई ते नवी मुंबई ही समुद्रावरील ट्रान्स हार्बर लिंकही उभी होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊ न पुढील काळातील महत्त्वाचे उद्योग व विकास केंद्र नवी मुंबई असेल. सीबीआरईचे भारत व नैऋत्य आशिया प्रमुख अंशुमन मॅनझिन यांच्यानुसार, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा नवी मुंबईपर्यंत विस्तार झाला आहे. या प्राधिकरणाने चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात १२,१०० कोटी रुपयांपैकी ८० टक्के रक्कम पायाभूत सुविधांसाठी ठेवली आहे. या भरमसाठ तरतुदीचा नवी मुंबईत विकासकामांना मोठा लाभ होईल. त्यातूनच पुढील दहा वर्षात गुंतवणूक व आर्थिक क्षेत्राचा हब हा नवी मुंबई असेल, असे अभ्यासात दिसले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईbusinessव्यवसायMumbaiमुंबईEconomyअर्थव्यवस्था