शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

वर्षभरात अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 23:40 IST

पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांतील सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना परत केला जाणार आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करण्यापेक्षा त्यामध्ये गेलेला ऐवज परत मिळवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. चोरी अथवा घरफोडी किंवा इतर गुन्ह्याच्या मार्गाने मिळवलेला ऐवजाची गुन्हेगाराकडून विल्हेवाट लावली जाते. तर रोख रकमेची चोरी झाल्यास तो पैसाही खर्च केला जातो किंवा इतर गोष्टीत त्याची गुंतवणूक केली जाते, त्यामुळे अशा गुन्ह्याच्या तपासात गुन्हेगार हाती लागल्यानंतरही त्याने चोरलेल्या ऐवजाची वसुली कशी करायची? असा प्रश्न पोलिसांपुढेअसतो. तर अनेकदा सराईत गुन्हेगार पकडल्यानंतरही ते गुन्ह्यातील ऐवज लपवल्याचे ठिकाण पोलिसांना सांगण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बहुतांश गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार पकडल्यानंतरही त्यामधील चोरीचा ऐवज परत मिळत नाही. अथवा चोरीला गेल्याच्या तुलनेत जप्त झालेला ऐवज अत्यंत कमी असतो. त्यामुळे तक्रारदारांकडून पोलिसांप्रति काहीशी नाराजीही व्यक्त केली जाते. यानंतरही पोलिसांकडून घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून तक्रारदारांचा चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो, त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी गतवर्षात घडलेल्या गुन्ह्यांपैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांमधील दोन कोटी ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गुन्हे शाखा पोलीस, परिमंडळ-एक तसेच परिमंडळ-दोन मधील पोलिसांनी हा ऐवज हस्तगत केला आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, वाहने यासह इतर वस्तूंचा समावेश आहे. हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते, त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबई पोलिसांकडून हा मुद्देमाल संबंधितांना परत दिला जाणार आहे.गुरुवारी पोलीस आयुक्तालयात विशेष कार्यक्रमांतर्गत संबंधित ८३ तक्रारदारांकडे त्यांचा ऐवज सुपूर्द केला जाणार आहे. त्यामुळे गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज पुन्हा हाती पडल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलणार आहे. गतवर्षीही अशा स्वरूपाचा कार्यक्रम नवी मुंबई पोलिसांनी घेऊन त्यामध्ये १९१ गुन्ह्यांतील चार कोटी तीन लाखांचा ऐवज संबंधित तक्रारदारांना परत केला होता.