शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 23:40 IST

पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांतील सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना परत केला जाणार आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करण्यापेक्षा त्यामध्ये गेलेला ऐवज परत मिळवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. चोरी अथवा घरफोडी किंवा इतर गुन्ह्याच्या मार्गाने मिळवलेला ऐवजाची गुन्हेगाराकडून विल्हेवाट लावली जाते. तर रोख रकमेची चोरी झाल्यास तो पैसाही खर्च केला जातो किंवा इतर गोष्टीत त्याची गुंतवणूक केली जाते, त्यामुळे अशा गुन्ह्याच्या तपासात गुन्हेगार हाती लागल्यानंतरही त्याने चोरलेल्या ऐवजाची वसुली कशी करायची? असा प्रश्न पोलिसांपुढेअसतो. तर अनेकदा सराईत गुन्हेगार पकडल्यानंतरही ते गुन्ह्यातील ऐवज लपवल्याचे ठिकाण पोलिसांना सांगण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बहुतांश गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार पकडल्यानंतरही त्यामधील चोरीचा ऐवज परत मिळत नाही. अथवा चोरीला गेल्याच्या तुलनेत जप्त झालेला ऐवज अत्यंत कमी असतो. त्यामुळे तक्रारदारांकडून पोलिसांप्रति काहीशी नाराजीही व्यक्त केली जाते. यानंतरही पोलिसांकडून घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून तक्रारदारांचा चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो, त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी गतवर्षात घडलेल्या गुन्ह्यांपैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांमधील दोन कोटी ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गुन्हे शाखा पोलीस, परिमंडळ-एक तसेच परिमंडळ-दोन मधील पोलिसांनी हा ऐवज हस्तगत केला आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, वाहने यासह इतर वस्तूंचा समावेश आहे. हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते, त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबई पोलिसांकडून हा मुद्देमाल संबंधितांना परत दिला जाणार आहे.गुरुवारी पोलीस आयुक्तालयात विशेष कार्यक्रमांतर्गत संबंधित ८३ तक्रारदारांकडे त्यांचा ऐवज सुपूर्द केला जाणार आहे. त्यामुळे गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज पुन्हा हाती पडल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलणार आहे. गतवर्षीही अशा स्वरूपाचा कार्यक्रम नवी मुंबई पोलिसांनी घेऊन त्यामध्ये १९१ गुन्ह्यांतील चार कोटी तीन लाखांचा ऐवज संबंधित तक्रारदारांना परत केला होता.