शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

वर्षभरात अडीच कोटींचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 23:40 IST

पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पोलिसांनी गतवर्षात अनेक गुन्ह्यांचा छडा लावून त्यामध्ये चोरीला गेलेला ऐवज परत मिळवला आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांतील सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना परत केला जाणार आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल करण्यापेक्षा त्यामध्ये गेलेला ऐवज परत मिळवण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. चोरी अथवा घरफोडी किंवा इतर गुन्ह्याच्या मार्गाने मिळवलेला ऐवजाची गुन्हेगाराकडून विल्हेवाट लावली जाते. तर रोख रकमेची चोरी झाल्यास तो पैसाही खर्च केला जातो किंवा इतर गोष्टीत त्याची गुंतवणूक केली जाते, त्यामुळे अशा गुन्ह्याच्या तपासात गुन्हेगार हाती लागल्यानंतरही त्याने चोरलेल्या ऐवजाची वसुली कशी करायची? असा प्रश्न पोलिसांपुढेअसतो. तर अनेकदा सराईत गुन्हेगार पकडल्यानंतरही ते गुन्ह्यातील ऐवज लपवल्याचे ठिकाण पोलिसांना सांगण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बहुतांश गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार पकडल्यानंतरही त्यामधील चोरीचा ऐवज परत मिळत नाही. अथवा चोरीला गेल्याच्या तुलनेत जप्त झालेला ऐवज अत्यंत कमी असतो. त्यामुळे तक्रारदारांकडून पोलिसांप्रति काहीशी नाराजीही व्यक्त केली जाते. यानंतरही पोलिसांकडून घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून तक्रारदारांचा चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो, त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी गतवर्षात घडलेल्या गुन्ह्यांपैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यापैकी ८३ गुन्ह्यांमधील दोन कोटी ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गुन्हे शाखा पोलीस, परिमंडळ-एक तसेच परिमंडळ-दोन मधील पोलिसांनी हा ऐवज हस्तगत केला आहे. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, वाहने यासह इतर वस्तूंचा समावेश आहे. हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते, त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करून नवी मुंबई पोलिसांकडून हा मुद्देमाल संबंधितांना परत दिला जाणार आहे.गुरुवारी पोलीस आयुक्तालयात विशेष कार्यक्रमांतर्गत संबंधित ८३ तक्रारदारांकडे त्यांचा ऐवज सुपूर्द केला जाणार आहे. त्यामुळे गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज पुन्हा हाती पडल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलणार आहे. गतवर्षीही अशा स्वरूपाचा कार्यक्रम नवी मुंबई पोलिसांनी घेऊन त्यामध्ये १९१ गुन्ह्यांतील चार कोटी तीन लाखांचा ऐवज संबंधित तक्रारदारांना परत केला होता.